सार्वजनिक होणार नसल्याचे मिस्त्री यांचे स्पष्टीकरण ः खासदारांच्या पत्राला उत्तर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होण्याआधीच पक्षातील फूट दिसून येऊ लागली आहे. पक्षातील अनेक ज्ये÷ नेते यावर वेगवेगळी मते मांडत आहेत. आता काँग्रेसच्या 5 खासदारांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे (सीईए) प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहिले आहे. पत्रात खासदारांनी पक्षाध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मनीष तिवारी, शशी थरूर, कार्ती चिदंबरम, प्रद्युत बोरदोलोई, अब्दुल खालिक या खासदारांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पारदर्शकता आणण्याबाबत 5 खासदारांच्या संयुक्त पत्राला मधुसूदन मिस्त्री लेखी उत्तर देणार आहेत. त्यानुसार मतदारयादी जाहीर केली जाणार नसल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
मधुसूदन मिस्त्री काँग्रेस अध्यक्षीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुका त्यांच्या देखरेखीखाली होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुसूदन मिस्त्री यांनी पत्र लिहिणाऱया खासदारांना उत्तर देताना काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि संविधानानुसार होईल याची खात्री केली जाईल असे सांगितले आहे. त्याचवेळी काँग्रेसने अंतर्गत निवडणुकीसाठी आपली मतदार यादी सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारयादी फक्त उमेदवारांना उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी संबंधितांना कळवले.
पक्षाचे खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम, प्रद्युत बोरदोलोई आर अब्दुल खालिक यांनी मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. या खासदारांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निष्पक्ष निवडणुका न होण्याची भीती व्यक्त केली आहे. मतदानात सहभागी होणाऱया संभाव्य उमेदवारांच्या नामांकनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्यांनी मिस्त्री यांना काँग्रेस समितीच्या प्रतिनिधींची यादी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. पत्र लिहिणाऱयांपैकी दोन खासदार शशी थरूर आणि मनीष तिवारी हे काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांच्या गट जी-23 चा भाग आहेत. या गटातील इतर सदस्य कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, जितिन प्रसाद, अश्विनी कुमार, आरपीएन सिंग यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. जितिन प्रसाद आणि आयपीएन सिंह भाजपमध्ये दाखल झाले आहेत, तर कपिल सिब्बल सपामधून राज्यसभेत पोहोचले आहेत. गुलाम नबी आझाद स्वतःचा पक्ष काढणार आहेत. सध्या ते जम्मू-काश्मीरमध्ये नव्या पक्षनिर्मितीसाठी राजकीय पायाभरणी करत आहेत.
19 ऑक्टोबरला मिळणार नवा अध्यक्ष
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अध्यक्षपदासाठी एकच उमेदवार असेल, अशा स्थितीत 30 सप्टेंबरलाच निकाल जाहीर होऊ शकतो. केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी 29 ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.