ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात आज १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. या निवडणुकीतथेट सरपंचपदासाठीही आज मतदान होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यात मतदान होत असून सायंकाळी पाच पाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येणार आहे.
कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान होत आहे. यावेळेस ग्रामपंचायतीच्या संरपचाचींसुद्धा थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. त्यामुळे गावागावांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या मतदानाचा निकाला १७ ऑक्टोबर रोजी हाती येणार आहे.
हे ही वाचा : हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या वैभव पाटीलची आत्महत्या
राज्यता या तालुक्यांमध्ये होत आहे मतदान
कोल्हापूर – भुदरगड- १, राधानगरी- १, आजरा- १ व चंदगड- १.
रत्नागिरी – मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर-३, रत्नागिरी- ४, लांजा- १५ व राजापूर- १०.
ठाणे – कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, व शहापूर- ७९.
पालघर – डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११ व वाडा- ७० ( पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७११ सदस्य बिनविरोध तर १० सरपंच बिनविरोध आलेत, तर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध आहेत )
रायगड – अलिबाग-३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३ व श्रीवर्धन- १.
सिंधुदुर्ग – दोडामार्ग- २ व देवडगड- २.
नाशिक: इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७ व पेठ- ७१.
नंदुरबार – अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५ व नवापूर- ८१.
पुणे – मुळशी- १ व मावळ- १.
सातारा – जावळी- ५, पाटण- ५ व महाबळेश्वर- ६.
अमरावती – चिखलदरा- १.
वाशीम – वाशीम- १.
नागपूर – रामटेक- ३, भिवापूर- ६ व कुही-८.
वर्धा – वर्धा- २ व आर्वी- ७.
चंद्रपूर –भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती-२९, कोरपणा- २५, राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १.
भंडारा – तुमसर- १, भंडारा- १६, पवणी- २ व साकोली- १.
गोंदिया – देवरी- १, गोरेगाव- १, गोंदिया-१, सडक अर्जुनी- १ व अर्जुनी मोर- २.
गडचिरोली – चामोर्शी- २, आहेरी- २, धानोरा- २, भामरागड- २, देसाईगंज- २, आरमोरी-२, एटापल्ली- २ व गडचिरोली- २