छोटय़ा वाहनांमुळे ग्रामीण भागात सेवा देण्यास मदत
प्रतिनिधी /वाळपई
पावसाळी हंगामात वादळी वाऱयामुळे विविध भागात झाडे पडण्याच्या घटना घडतात. अडचणीचा सामना करण्यासाठी अग्निशामक दलाची यंत्रणा सज्ज झालेली आहे. वाळपई अग्निशामक दलासाठी एक छोटे वाहन दाखल झालेले आहे. अरुंद रस्त्यावर छोटय़ा वाहनांच्या माध्यमातून सेवा देण्याची तयारी अग्निशामक दलाने ठेवलेली आहे. त्यामुळे यंदा पावसाळी मोसमामध्ये अडचणी निर्माण झाल्यास त्याठिकाणी तत्काळ मदत करण्याच्या दृष्टीने चांगली सुविध उपलब्ध झाली आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी दिली.
सत्तरी तालुक्यात एक पलिका क्षेत्र तसेच बारा पंचायती असून बराचसा भाग ग्रामीण आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी मोठी वाहने जात नाहीत. या ठिकाणी अग्निशामक दलाची सेवा देण्यासाठी विविध अडचणी निर्माण होतात. यामुळे कर्मचाऱयांना युद्धपातळीवर काम करून अडीअडचणीच्या ठिकाणी जाऊन सेवा देण्यासाठी काम करावे लागते. यामुळे छोटी वाहने देण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन अग्निशामक दलाच्या वरि÷ अधिकाऱयांनी सत्तरी तालुक्मयासाठी छोटे वाहन दिलेले आहे. सदर वाहन अडीअडचणींच्या ठिकाणी जाऊन सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे. याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पावसाळय़ात याचा चांगला उपयोग होणार असल्याचे संतोष गावस यांनी सांगितले.
छोटय़ा वाहनामुळे चांगली सेवा देण्यास मदत
वाळपई अग्निशामक दलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे वाहन देण्यात आलेले आहे. या वाहनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांना एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे संतोष गावस म्हणाले.
पाण्यामध्ये सेवा देण्यासाठी प्रयत्न
पाण्यामध्ये सेवा देण्यसाठी दृष्टिकोनातून छोटी बोट दिली आहे. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये सेवा द्यायची असेल तर आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामुळे आता पाण्यामधील अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सेवा देण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाची यंत्रणा करणार आहे. या पूर्वी या सुविधा फोंडा किंवा अन्य भागातून मागविला जात होत्या. आता ही सुविधा वाळपईच्या अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडे उपलब्ध झालेली आहेत. यामुळे येणाऱया काळात कोणत्या प्रकारचे अडचणी निर्माण होणार नाही, असेही गावस यांनी स्पष्ट केलेले आहे.
हंगामी कामगार देण्यास वाळपई पालिकेकडून नकार! दरम्यान पावसाळी मोसमामध्ये अग्निशामक दलाच्या यंत्रणेला मदत करण्यासाठी वाळपई पालिकेकडून 15 हंगामी कामगाराची व्यवस्था करण्यात येत होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून पावसाळय़ात चांगली मदत मिळत होती. यंदा मात्र पालिकेने कामगार देण्यासाठी नकार दिलेला आहे. यामुळे काही प्रमाणात समस्या निर्माण होण्याची शक्मयता संतोष गावस यांनी व्यक्त केलेली आहे.