विविध वर्गांतील मिळून 550 विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका : पहिल्या मजल्याच्या भिंतींचे तडे धोकादायक वळणावर : बांधल्यापासून 35 वर्षांत एकदाही इमारतीची दुरुस्ती नाही
उदय सावंत / वाळपई
वाळपई येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारतीची अवस्था दयादनीय झालेली आहे. इमारतीच्या वरील मजल्याच्या इमारतीला तडे गेले असून यामुळे 550 विद्यार्थ्यांचे जीवाला धोका निर्मा झाला आहे. त्याचप्रमाणे भिंती पावसाने ओल्या होऊ लागल्यामुळे शॉक येऊ लागलेला आहे. यामुळे सध्यातरी विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष गावकर यांनी यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधले असून स्थानिक आमदार तथा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी केली असून याबाबत आपण लवकर त्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
35 वर्षांपासून अजिबात दुरुस्ती नाही.
या इमारतीची उभारणी तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी 1985 साली केली होती. वाळपई भागांमध्ये शैक्षणिक क्रांती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून उच्च माध्यमिक विद्यालयाची सुरुवात सरकारी पातळीवर केली होती. मात्र आश्चर्याची बाब अशी की 35 वर्षापासून सदर इमारतीची दुरुस्ती अजिबात घेण्यात आलेली नाही .यामुळे या इमारतीची सध्यातरी दयदनीय अवस्था झालेली आहे. इमारतीच्या छताचे काम हाती घेणे गरजेचे होते. मात्र त्या संदर्भात अजून पर्यंत लक्ष देण्यात आलेले नाही.
वरील मजल्याच्या भिंतींना तडे धोकादायक वळणावर.
इमारतीची पाहणी केली असता वरील मजल्याच्या इमारतीला तडे गेलेले आहेत .यामुळे भिंतींना वापरण्यात आलेल्या लोखंडे सळय़ा स्पष्टपणे दिसत आहेत. या सळय़ा पूर्णपणे गंजलेल्या असून यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की शैक्षणिक वर्ग सुरू असताना सिमेंटचे लवलेश खाली पडतात. यामुळे ही इमारत कधी खाली येईल हे सांगता येत नाही अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
इमारतीच्या छप्परी भागाला धोका निर्माण झालेला आहे. भागाची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे होते. मात्र त्या संदर्भाचे नुकसानी झाल्यामुळे पावसाचे पाणी सरळ भिंतीमध्ये पडून वर्गामध्ये येत असून वरच्या मजल्यावर तळय़ाचे स्वरूप निर्माण होत आहे.
विजेचा शाॅक येण्याच्या घटना
सदर विद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी सांगितले की पावसाळी मौसमामध्ये भिंतीमधून पाणी येत असल्यामुळे विजेच्या उपकरणाला शॉक येत आहे .या संदर्भाच्या अनेक घटना यापूर्वी घडलेले आहेत. मात्र सुदैवाने जीवितहानी झालेले नाही. या संदर्भाच्या तक्रारी अनेकवेळा विद्यालयाच्या प्राचार्यांशी केल्या मात्र असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. सध्या भिंतीना असलेल्या सर्व विजेचे उपकरणे पावसामध्ये भिजलेली आहेत .यामुळे सदर उपकरणाना हात लावणे धोक्मयाचे बनू शकते असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.
550 मुलांसाठी जागा अपुरी शेजारच्या धोकादायक इमारतींमध्ये वर्ग.
गेल्या पाच वर्षापासून उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वाणिज्य, कला, विज्ञान व व्यावसायिक शाखांचा निकाल चांगला लागत आहे. यामुळे विद्यालयाची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे?. यंदा मुलांची संख्या 550 झालेली आहे. प्रमुख इमारतीमध्ये जागा अपुरी पडू लागली आहे. यामुळे सध्यातरी व्यवसायिक शाखेचे वर्ग शेजारी असलेल्या एका धोकादायक इमारतीत वळविण्यात आलेले आहे. सदर इमारत अत्यंत धोकादायक स्वरूपाची आहे.
इमारत पाडण्याचे आदेश
सदर इमारत धोकादायक असल्यामुळे ती पाडावी अशा प्रकारचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेले आहे असे असताना सुद्धा प्रमुख इमारतीत जागा अपुरी पडत असल्यामुळे नाईलाजाने व्यावसायिक शाखेचे वर्ग सदर ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. वर्गामध्ये पाणी येत असून मुलांना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. पावसापासून बचाव करण्यासाठी ताडपत्रीचे आच्छादन घालण्यात आलेले आहे. अशा प्रकारची दुर्देवी परिस्थिती सध्यातरी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरामध्ये पहावयास मिळत आहे.
अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र काहीच उपयोग नाही : प्राचार्य
उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जमादार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की विद्यालयाच्या धोकादाय इमारती संदर्भात अनेकवेळा वाळपई सर्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाशी संपर्क साधला. या संदर्भाची अनेक पत्रे त्यांना पाठविले मात्र अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. सध्यातरी या विद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या डोक्मयावर धोक्मयाची टांगती तलवार आहे. यामुळे कोणत्याही क्षणी धोकादायक प्रसंग घडू शकतो असे यावेळी त्यांनी सांगितले. या संदर्भाच्या तक्रारी शिक्षण खात्याला पाठविण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.