गावठी मिरची, मसाला, प्लास्टिक खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी
प्रतिनिधी /वाळपई
मान्सूनच्या आगमनाला अवघे दिवस बाकी राहिले असताना वाळपईचा आठवडा बाजार बेगमीच्या वस्तूंनी फ्gढलल्याचे चित्र पहावयास मिळाले. गावठी मिरची, कांदा, बटाटा, सुकी मासळी, कोकम, चिंचेचे आंबट, मसाल्याचे पदार्थ याबरोबरच प्लास्टिक कागद, रेनकोट, छत्र्या मोठय़ाप्रमाणत विक्रीस आल्याचे दिसून आले.
सत्तरीतील जनतेने पावसाची बेगमी करण्याच्या दृष्टिकोनातून खरेदीसाठी वाळपई आठवडा बाजारात सकाळी गर्दी केली होती. खासकरून गावठी मिरची, कांदा, सुकी मासळी, मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिला आहे. आठवडी बाजारामध्ये कर्नाटक भागातील जांबोटी मिरची दाखल झाली होती ती 250 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. तसेच पेडणे भागातील गावठी मिरची 500 रुपये किलो प्रमाणे विक्रीला उपलब्ध होती. बाजारात कांदा 80 रुपये किलो तर बटाटा 50 रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता.
यंदाचा काजू मोसम नुकताच संपुष्टात आला यामुळे काजूची विक्री करून त्यामध्ये आलेल्या पैशातून पावसासाठी लागणाऱया विविध बेगमीच्या वस्तूंची खरेदी करण्यावर लोक भर देत असल्याचे दिसून आले. वाळपई शहरात फातिमा कॉन्व्हेंट रस्त्यावर विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच मासोर्डे गावाकडे जाणाऱया रस्त्यावर विविध प्रकारच्या कपडय़ांची दुकाने थाटली होती त्यातून लोक खरेदी करत असताना दिसून आले.
आजच्या आठवडा बाजारात कर्नाटकची जांबोटी मिरची व पेडणेची गावडी मिरची मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होती. दोन्ही जातीच्या मिरचीची खरेदी करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. जांबोटी मिरची 250 रुपये तर पेडणची मिरची 500 रुपयांने विकली जात होती. यंदा मिरचीचा दर बऱयाच प्रमाणात वाढलेला आहे. गोमंतकियासाठी मिरची हा दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक आहे. पेडणे भागातील मिरचीचा दर प्रचंड वाढलेला आहे. यामुळे दरदिवशी ही मिरची वापरणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. यामुळे कर्नाटक जांबोटी येथील मिरची मिसळून दैनंदिन वापरासाठी याचा उपयोग होऊ शकतो, असे एक ग्राहक रुक्मिणी गावकर यांनी सांगितले.
पावसाळय़ापूर्वी मिरचीची खरेदी करणे गरजेचे आहे. कारण एकदा पाऊस सुरू झाला की मिरचीचा दर गगनाला भिडणार आहे. सध्या या भागातील मिरचीचा दर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तरीसुद्ध पेडणे याभागातील मिरची ही गोमंतकीय यासाठी आवश्यक असते. यामुळे मोठय़ा प्रमाणात पेडणे भागातील मिरचीला मागणी आहे. कर्नाटक जांबोटी मिरचीचा दर सध्यातरी नियंत्रणात आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर हा दर वाढण्याची शक्मयता आहे. गेल्या वषी पावसाळय़ात ही मिरची 900 रुपये किलो विकली जात होती, असे मिरची खरेदी करणारे ग्राहक महादेव गावकर यांनी सांगितले.
कांदा, बटाटा महागला
आजच्या वाळपई आठवडी बाजारामध्ये बटाटा व कांदा बऱयाच प्रमाण महागला असल्याचे दिसून आले. कांदा 80 रुपये तर बटाटा 50 रुपये किलो दराने विकला जात होता. यंदा कांद्याचा दर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. पावसाळा सुरू झाला की त्याचा दर आणखी वाढण्याची शक्मयता आहे.. यामुळे पावसाळय़ापूर्वी त्याची खरेदी करणे अधिक योग्य ठरेल, असे खरेदीदार गोपिकी नाईक यांनी सांगितले.
गेल्या वषीपेक्षा यंदा प्लास्टिक ताडपत्रीचा दर बऱयाच प्रमाणात वाढला आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची शक्मयता आहे. तरीसुद्धा आज समाधानकारक धंदा झाला.आगामी काळात प्लास्टिकची मोठय़ा प्रमाणात खरेदी होणे गरजेचे आहे. मात्र वाढलेला दर पाहता यंदा धंदा अधिक होईल असे वाटत नसल्याचे प्लास्टिक कागद, ताडपत्री विपेता महम्मद खान यांनी सांगितले.
गेल्यावर्षी सुद्धा आपण सुकी मासळी विकण्याचा धंदा केला होता. मात्र गेल्यावर्षी मासळीचा दर नियंत्रणात असल्यामुळे मोठी खरेदी झाली होती. यंदा सुक्या मासळीचा दर देखील वाढला असल्याने त्याचा परिणम व्यावसायावर होण्याची शक्यता आहे. पाउढस सुरू झाल्यानंतर सुक्या मासळीचा दर आणखी वाढण्याची शक्यता मासळी विक्रेते गोपाळ गावस यांनी सांगितले.
सुकी मासळी खरेदीवर भर
एकदा पावसाळा सुरू झाला की मासेमारी बंद होते. परिणामी ताजी मासळी मिळणे दुर्मिळ बनते. यामुळे मासळी खवय्यांना सुक्या मासळीवर आपली गरज भागवावी लागते. पावसाळ्यात सुकी मासळी महाग असते यामुळे पावसापूर्वीच सुक्या मासळीची खरेदी करून बेगमी केली जात असल्याने सुकी मासळी खरेदी करण्यावर लोकांनी भर दिला असल्याचे दिसून आले.
प्लास्टिक खरेदीसाठी गर्दी
पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात येत असतो?. यामुळे वाळपई शहरात प्लास्टिक खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पावसाळा जवळ आल्यामुळे लोकांनी प्लास्टिक खरेदी करण्यावर अधिक भर दिला होता. आठवडी बाजारामध्ये प्लास्टिकची विक्री करणाऱयांची संख्या अधिक होती.