वार्ताहर /नंदगड
तालुक्यातून आळंदीहून पंढरपूरकडे पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी खानापूर तालुक्मयाच्या विविध भागांतून अनेक वारकरी आळंदीकडे रवाना होत आहेत.
खानापूर तालुक्मयात अनेक वारकरी आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. पूर्वी वारकरी देवाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱया मिरज-पंढरपूर रेल्वेने पंढरपूरला जात असत. रेल्वेचा प्रवास सुखकर व स्वस्त असल्याने रेल्वेला विशेष महत्त्व दिले जात होते.
अलीकडे टेंपो, टॅक्स आदी वाहनांची खेडोपाडी संख्या वाढली आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा गावागावांतून वारकरी आपापल्या टेंपो, ट्रक्समधून पंढरपूरला जात आहेत. अलीकडे आळंदीहून पंढरपूरकडे येणाऱया पायी दिंडीत सामील होणाऱयांची संख्या वाढत आहे. आळंदीहून पायी दिंडी सुरू होण्याच्या दोन-तीन दिवस आधीच खानापूर तालुक्यातून वारकरी रवाना झाले आहेत.