दोन वर्षाच्या कोरोना खंडानंतर वारकऱयामध्ये उत्साह
वार्ताहर /माशेल
कोरोना महामारीमुळे खंड पडलेली पंढरपूर वारकरी यात्रा (वारी) पुन्हा एकदा माशेल येथील वारकऱयांनी सुरू केली आहे. टाळ गजरांच्या साथीने पंढरपूरच्या वाटेवर विघालेल्या वारकऱयानी सर्वप्रथम देवकीकृष्ण मंदिरात श्रींचे दर्शन व आशिर्वादाने वारीस प्रारंभ केला.
वारीच्या प्रारंभी वारकरी माशेल येथील बाजार वाडय़ावरील विठ्ठल मंदिरात जाऊन नतमस्तक झाले. विठ्ठल मंदिरात वारकऱयानी अल्पोपहार करून प्रयाण केले. पंढरपूरच्या पारी वारीत 25 युवक तसेच वयस्क सहभागी झाले आहे. या वारीचे प्रमुख उदय भगत, उदय गावडे, नारायण गावकर आहेत. माशेल पासून सुरू झालेला हा प्रवास 350 किं. मिटरचा असून दर दिवस ते 25 किमी. चालत जाऊन दि 8 जुलै रोजी पंढरपूरला पोचणार आहेत. एकूण 15 दिवसाची ही वारीची यात्रा आहे. 10 जुलै रोजी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल दर्शन तसेच मंदिराच्या कलशाचे दर्शन घेऊन ते 11 जुलै रोजी माशेल येथे परतीच्या प्रवास धरणार आहे.
वारकरी उदय भगत यावेळी बोलताना म्हणाले की गेली दोन वर्षे कोरोनामुळे वारी होऊ शकली नव्हती, याची खंत आजही आहे. यंदाही आम्ही ज्या संघटनेतर्फे जात होतो त्या संघटनेतर्फे वारी रद्द केली आहे. वारीचा दिनक्रम पुर्वनियोजित न करता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे वारकरी विठ्ठलाच्या आशिर्वादानाच 15 दिवसाच्या पायी वारीला सुरूवात केल्याचे भगत म्हणाले. नारायण गावकर म्हणाले की आषाढ महिना आला की आम्हाला वारीची हुरहुर लागते. पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत उन पावसाची तमा न बाळगता नामजप करीत वारीला प्रारंभ केला आहे.