भाताला 2250 रु. किमान हमीभाव, शेतकऱयांना सवलती मिळवून द्या : काकती येथील शेतकऱयांच्या बैठकीत मागणी : अधिकारी धारेवर
वार्ताहर /काकती
शेतकऱयांच्या धान्याला रास्त भाव द्या, शासनाच्या सेवा, सुविधा, सवलती मिळवून द्या, शेतकऱयांचे सारे प्रश्न मार्गी लावा. अन्यथा धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. काकती येथील मध्यवर्ती होळी-लक्ष्मी चौक येथे बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी राजाध्यक्ष धर्मराज गौडर होते.
स्वागत व प्रास्ताविक अरुण टुमरी यांनी केले. भाताला रास्त भाव मिळवून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा मिळवून देऊन सुसज्ज हॉस्पिटल बांधणे, शेतवडीतील रस्ते, भातासाठी गोडाऊन, शेतीत सिंचनासाठी वीजपुरवठा, हिंडाल्को कंपनीच्या मोठय़ा तलावात येणारे ऍसिडमिश्रीत पाणी बंद करणे, जमिनीची प्रत सुधारण्यासाठी नुकसानभरपाई देणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.
बैठकीच्या जागेवरच रयत केंद्राचे प्रमुख कृषी अधिकारी अरुण कापशी, कृषी अधिकारी आर. बी. नायकर, हेस्कॉमचे सेक्शन अधिकारी शिवानंद गलगली, उपतहसीलदार सदाशिव साळुंखे आदींना धारेवर धरून शेतकऱयांचे प्रश्न, सेवा-सवलती मिळवून देण्यासाठी कार्यतत्पर रहा, असे बजावण्यात आले. भात व्यापाऱयांनी किमान 2250 रु. भाव द्यावा, वजनमापात पारदर्शकता बाळगावी, शेतकऱयांची बिले चुकता करावीत. व्यापारी संगनमत करून भाव कमी देतात, असे विचार संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मराज गौडर, कार्याध्यक्ष बसनगौडा पाटील, खानापूर तालुका अध्यक्ष रुद्रगौडा पाटील यानी मांडले.
उपतहसीलदार सदाशिव साळुंखे, ग्रामलेखाधिकारी प्रकाश गमाणी यांनी दवाखाना, भातासाठी गोडाऊन व हिंडाल्को अधिकाऱयाला बोलावून ऍसिडमिश्रीत पाण्याची समस्या, नुकसानभरपाईबाबत शुक्रवारी निर्णय घेण्याचे अधिकाऱयांना बजावले. काकती संघाचे अध्यक्ष मोहन कंग्राळकर, उपाध्यक्ष मारुती नरेगवी यांना तालुका अध्यक्ष आणि तालुका उपाध्यक्षपदी पदोन्नती देऊन सन्मानित केले. एपीएमसी माजी अध्यक्ष बाबुराव पिंगट यांनी सुरळीत वीजपुरवठय़ाबाबत मागणी केली. यावेळी सिद्दाप्पा टुमरी, बसवंत कुंभार, सुनील मोळेराखी, संभाजी मोळेराखी, शंकर बसरीकट्टी, मारुती कंग्राळकर, नागेंद्र टुमरी, बसवाणी, येतोजी भीमा टुमरी, पुंडलिक टुमरी उपस्थित होते. जिल्हा कार्याध्यक्षा हेमा काजगार यांनी आभार मानले.