दरवषी साचणाऱया समस्येचे निवारण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाला प्रारंभ झाला की, विविध परिसरात पाणी साचण्यास सुरुवात होते. शहरातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. पण पावसाळय़ात निर्माण होणाऱया समस्यांचे निवारण करण्यास मनपा अपयशी ठरली आहे. त्यामुळे पाटील गल्ली शनिमंदिर परिसरात पावसाचे पाणी साचून समस्या निर्माण होत आहे.
कपिलेश्वर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली, पण येथील समस्यांचे निवारण करण्यात मनपा प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचून दरवषी पाटील गल्लीत शनिमंदिरासमोरील रस्त्यावर पाणी साचत आहे. पावसाचा जोर वाढला की, तहसिलदार गल्ली, भांदुर गल्ली आणि पाटील गल्ली आदी परिसरातून वाहणाऱया गटारी तुडुंब भरून वाहू लागतात. पण पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने येथील समस्या कायमची बनली आहे.
रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळी या परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. पावसाचे पाणी घरात शिरल्याने मोठय़ाप्रमाणात नुकसान होत आहे. गणेशोत्सव असल्याने विविध साहित्याचा साठा करण्यात आला आहे. पण याठिकाणी पाणी शिरल्याने नुकसान झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरवषी निर्माण होणाऱया समस्येचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.