रत्नागिरी / प्रतिनिधी
दोन दिवस पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी -लांजा मार्गावरील तोणदे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद झाली आहे. त्यामुळे चांदराई आणि तोणदे गावांचा संपर्क तुटला आहे.
वाढत्या पावसामुळे या मार्गावरिल वाहतूक विस्कळित झाली आहे. रत्नागिरी -लांजा मार्ग हा रहदारीचा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालु असते. या मार्गावरिल तोणदे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद झाली आहे त्यामुळे पुढील चांदराई आणि तोणदे गावांचा संपर्क तुटला आहे. वाढत्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.