बेळगाव : लोककल्प फाउंडेशनतर्फे ‘केअर फॉर यू’च्या सहकार्याने चार शाळांना वॉटर फिल्टर देण्यात आले. लोककल्पने लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून कणकुंबी, कालमणी, आमटे व जांबोटी येथील सरकारी शाळांना वॉटर फिल्टर देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. सदर उपक्रमाबद्दल चारही शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोककल्प व ‘केअर फॉर यू’ला धन्यवाद दिले आहेत.
Previous Articleशेवटचा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा
Next Article उत्सव गणेशाचा….राबणाऱ्या हातांचा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.