ग्रामसभेत जोरदार मागणी, पंचायत भ्रष्टाचारमुक्त करण्याची पंचायत मंडळाची ग्वाही
वार्ताहर /लाटंबार्से
साळ व पंचक्रोशीतील पिण्याची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी साळ येथे लघु जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले होते. मात्र हा प्रकल्प मेणकुरे येथे होणार असे सरकारने जाहीर कसे केले ? असा प्रश्न विचारला असता आपण याविषयी सखोल चौकशी करून साळ येथे हा प्रकल्प होण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही सरपंच सावित्री घाडी यांनी दिली. उपस्थित ग्रामस्थांनी हा प्रकल्प साळमध्येच झाला पाहिजे अशी जोरदार मागणी यावेळी केली.
ओहाळाच्या पाण्याला येणाऱया दुर्गंधीवर तोडगा काढणे, पंचायत इमारतीत महिलांच्या कार्यालयासाठी एक खोली उपलब्ध करावी, मधलावाडा तिठा येथील प्रवासी शेड मोडावी, घरकुल योजनेविषयी नियमावली सभागृहात सादर करावी, माडवेश्वर ते बाबरेश्वर ते कोळम पर्यंत जी पाऊलवाट पूर्ण करावी, व्यायाम शाळेसाठी जागा उपलब्ध करावी, कदंब बस नियमित करावी, खालचावाडा राष्ट्रोळी देवस्थान क्षेत्राजवळ असलेल्या सभागृहाच्या छताचे काम पूर्ण करावे, गावात दररोज डॉक्टर उपलब्ध व्हावा, खालचावाडा येथील पुलाची दुरुस्ती करावी, आमदारांनी महिन्यातून एकदा तरी पंचायतीला भेट द्यावी आदी समस्या ग्रामस्थांनी मांडल्या.
या ग्रामसभेत मेघश्याम राऊत, सोमा राऊत, बाबनी परवार, राहूल परवार, दिलीप देसाई, यशवंत राऊत, विवेक घुरे, बाबी राऊत, दिगंबर राऊत, संदीप राऊत, सुखदा राऊत, प्रिया राऊत, कीर्ती राऊत, उर्मिला राऊत, कालिदास राऊत, सपना शिरोडकर, मुकुंद राऊत, संतोष राऊत, सुरेश परब, गोपाळ राऊत, गोपी राऊत, विनायक ठाकुर, प्रीती परब, विद्या देसाई, प्रज्ञा राऊत व अनेकांनी या चर्चेत भाग घेतला.
या सभेत साळचे सुपुत्र गोव्याचे माजी मंत्री स्वर्गीय पांडुरंग दत्ताराम राऊत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सरपंच सावित्री घाडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला उपसरपंच देऊ (आपा) मधुकर राऊत, पंच वैष्णवी वासुदेव परब, पंच विशाल विठ्ठल परब, पंच निता मेघश्याम राऊत, पंच मनू शिंदे, पंच दिव्या देवदास नाईक यांच्यासह ग्रामस्थांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
पंचायत सचिव पुंडलिक गवस यांनी ग्रामसभेचा अहवाल वाचला. सर्वेश चांदेलकर यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निरसन केले. गटविकास अधिकारी कार्यालयाकडून भालचंद्र बिर्जे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. शांबा घुरे व आनंद राऊत यांनी या ग्रामसभेचे व्यवस्थापन केले. पंच वैष्णवी परब यांनी आभार मानले.
यावेळी उत्तर गोवा उत्कृष्ट मंडळ जिल्हा पुरस्कार प्राप्त झालेल्या छत्रपती शिवाजी मंडळाला ग्राम पंचायतीतर्फे सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी विविध समित्यांवर ग्रामस्थांची निवड करण्यात आली.