बेळगाव प्रतिनिधी – सह्याद्रीनगर, सारथीनगर, पोलीस कॉलनी, डी ग्रुप कॉलनी, आणि आश्रय कॉलनी येथे दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा बॉक्साईट रोड येथे रस्ता रोको करू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या सर्व परिसराला पाणी नसल्यामुळे टँकरने पाणी खरेदी करावे लागत आहे. या पाण्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. याबाबत अनेक वेळा एल अँड टी या पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे अखेरचे निवेदन असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. महसूल अधिकारी एस. एम. बरगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नामदेव हट्टी, एस. एस. नागणूर बी.आर. ढाबळे, स्वामी हिरेमठ, आरिफ खान, एम. डी कलशेट्टी यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
Trending
- विरियातोंच्या विधानाचा पंतप्रधानांकडून समाचार
- पंतप्रधानांच्या सभेसाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर
- मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेच्या विचारांशी कटिबद्ध राहून प्रचार करणार – ऋत्विक सामंत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बेळगावात
- केदनूरजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
- नेहाच्या हत्येचे भाजपकडून राजकारण
- काँग्रेसने देशाची एकता-अखंडता राखली
- पोलीस अधिकाऱ्यासह 14 जणांवर गुन्हा