प्रतिनिधी / खानापूर : शहराला लागून असलेल्या खेमेवाडी गावात गेल्या महिन्यावरापासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. याबाबत हेस्कॉमकडे वारंवार तक्रार करून देखील हेस्कामने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ग्राम पंचायतीने याबाबत पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी टीसी बसवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने गेल्या महिन्याभरापासून खेमेवाडीत पाणीपुरवठा बंद आहे. लोक शेतातील पाणी वापरत आहेत त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण दिल्यासारखे आहे. तसेच ग्रामपंचायतीकरडून आठ किंवा दहा दिवसांनी एकदा टँकर येत आहे. पाण्याविना महिलांचे मोठे त्रास होत आहेत. तसेच आता चुकीचा हंगाम सुरू झाल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिला आता आक्रमक झालेल्या आहेत.
Trending
- मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा
- ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड…उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
- रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !
- नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज !
- जिल्हा परिषदेच्या लेखाधिकाऱ्याचे अपहरण करुन मारहाण ! कनिष्ठ लिपिकासह ८ जणांना अटक
- विजय सरदेसाई हे ‘कटाप्पा’
- 99 टक्के कामे पाच वर्षांत होणार पूर्ण
- आरजीपीचे रूबर्ट, मनोज यांचे अर्ज सादर