संबंधित अधिकाऱयांना निर्देश, अन्यथा कारवाई : जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांचा इशारा: केरी, मोर्ले, पर्ये, होंडा, भिंरोडा पंचायत क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणी प्रकल्प उभारणार
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकऱयांना वेळेवर पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकऱयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यंदापासून 15 नोव्हेंबर पर्यंत जलसिंचन खात्याच्या माध्यमातून शेतकऱयांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत. अन्यथा संबंधित अधिकाऱयांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला आहे.
पर्ये मतदार संघाच्या शेतकरी बांधवांच्या समस्या व केरी, मोर्ले, पर्ये, होंडा, भिंरोडा पाच पंचायतींच्या पाणीपुरवठा संदर्भाची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी चरावणे धरण प्रकल्प युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगितले. शक्यतो एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे उपस्थित होत्या.
सत्तरी तालुक्मयामध्ये उपसा व अंजुणे धरण प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे अनेक बंधाऱयांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा करण्यात येत असतो. सदर पाणी उपसा योजनेद्वारे शेतीसाठी पाणीपुलवठा केल्या जातो. गेल्या अनेक वर्षांपासून सदर पाणी वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकऱयांना शेती व कृषी बागायतीची कामे हाती घेता येत नाहीत. यामुळे सातत्याने तक्रारी येत असतात. जलस्रोत खात्याने या तक्रारीची दखल घेतली असून. यंदापासून 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्वत्र जलसिंचन खात्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. निर्देश सर्व संबंधित अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकाऱयांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा मोर्ले येथील बैठकीत मंत्री सुभाष शिरोडकर दिला आहे. ज्या भागात पाणीपुरवठा होणार नाही त्या भागातील शेतकऱयांनी आपल्याला माहिती द्यावी, असे आवाहन सुभाष शिरोडकर यांनी केले.
केरी, मोर्ले, पर्ये आदी भागातील शेतकऱयांना धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. धरण प्रकल्पातील पुनर्वसन भागामध्ये ज्या बांधवांना भूखंड देण्यात आलेले आहेत. मात्र काही भूखंडांना पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे सदर ठिकाणी कृषी बागायती करणे शक्मय नसल्याच्या तक्रारी यावेळी शेतकरी बांधवांनी मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासमोर मांडल्या. यावेळी त्यांनी जलसिंचन खात्याच्या संबंधित अधिकाऱयांना फैलावर घेतले व आठ दिवसांत सदर समस्या सोडविण्यात याव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे.
पाच पंचायतांसाठी मोर्ले येथे स्वतंत्र प्रकल्प उभारणार
पर्ये मतदारसंघात येणाऱया केरी, मोर्ले, पर्ये, होंडा व पिसुर्ले आदी भागांमध्ये पाण्याची समस्या असते. यामुळे मोर्ले येथे वाळवंटी नदीच्या पाण्यावर स्वतंत्र प्रकल्प उभारल्यास या पंचायतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी जलसिंचन खात्याच्या मालकीची जमीन सदर प्रकल्पासाठी द्यावी, अशी आमदार दिव्या राणे यांनी जलस्रोतमंत्री शिरोडकर यांच्याकडे मागणी केली. ती मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मान्य केली. या संदर्भात पाणीपुरवठा खात्याने सदर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अन्यथा संबधितांवर कारवाई केली जाईल!
पाटबंधारे नादुरुस्त झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी होत असते. याची दुरुस्ती करण्याच्या मागणी अनेकवेळा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा तक्रारी यावेळी शेतकऱयांनी मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासमोर मांडल्या असता त्यांनी आपण या येथे मनोरंजनासाठी आलेलो नाही, अशा क्षुल्लक तक्रारी आपल्या कानावर येता कामा नये, तसे असल्यास आपल्याला संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी लागेल, असा इशार त्यांनी दिला. जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी, अधीक्षक अभियंता अंकुश गावकर यांनी यासंदर्भात विशेष लक्ष देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
पडोसे प्रकल्प सत्तरीत मात्र आजूबाजूचे गाव कोरडेच : आमदार राणे
पडोसे या ठिकाणी 50 एमएलडी क्षमतेचा पाणी प्रकल्प आहे. वाळवंटी नदीचे पाणी शुद्ध झाल्यानंतर डिचोली तालुक्मयासह बार्देश तालुक्मयातील काही गावांना पुरवण्यात येते. मात्र ज्या भागांत हा प्रकल्प आहे. त्याच भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. याकडे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी विशेष लक्ष द्यावे व् अशी मागणी आमदार डॉ. देविया राणे यांनी यावेळी केली.
केरी येथील श्री सातेरी आजोबा देवस्थानची प्रसिद्ध आजोबा तळी आहे. सदर तळीतील पाण्याचा वापर सभोवताली शेती बागायतीसाठी करण्यात येतो. या तळीचा विकास करण्याचे आश्वासन यावेळी मंत्री शिरोडकर यांनी दिले. यावेळी मोर्ले सरपंच अमित शिरोडकर पर्ये सरपंच रती गावकर, भिंरोडा सरपंच उदयसिंग राणे, पिसुर्ले सरपंच देवानंद परब यांनी आपापल्या भागातील जलस्रोत खात्यासंदर्भात समस्या मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासमोर मांडल्या.