प्रतिनिधी / खानापूर : माचीकड ग्रामपंचायतीचे वॉटरमन रामचंद्र राजाराम शिंदे ( वय ४२ ) यांचा सोमवारी विजेचा धक्क्याने मृत्यू झाला झाला. ते माचीगड ग्रामपंचायतीत वाटर मॅन म्हणून कार्यरत होते. सोमवारी सकाळी पाणि पुरवठा करण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यास गेले असता तिथे विद्युत प्रवाहामुळे विजेचा धक्का बसला. त्या ठिकाणी ते कोसळले विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने त्यांना खानापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असता तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी वडील असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.