सावंतवाडी / प्रतिनिधी–
बालभारती मधील प्रतिज्ञा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या प्रतिज्ञेचा विचार जनमानसात रुजविण्यासाठी आज सर्व धर्मियांनी एकत्र येत रक्षाबंधन साजरे केले.आम्ही सावंतवाडीकर व श्रीराम वाचन मंदिराच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते.आज ॲड संदीप निंबाळकर यांनी या उपक्रमाचे प्रास्ताविक केले.नशाबंदीचा विचार मांडण्यासाठी खास कणकवली येथून अर्पिताताई मुंबरकरांनी आपली हजेरी लावली यावेळी अर्पिताताईनी व्यसनाधीनतेमुळे तरुणाईचे होणारे मानसिक खच्चीकरण यावर प्रकाश टाकून,समाजांने व्यसनाधीनतेच्या विरोधातील लढाईत सक्रीय सहभाग द्यावा असे आवाहन केले.