सावंतवाडी / प्रतिनिधी –
दीपक केसरकर राज्यमंत्री असताना चांदा ते बांदा योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच आंबोली भागात पर्यटनाची कामे करण्यात आली. या पर्यटनाच्या कामात मोठा अपहार झाला आहे. याबाबतची माहिती माहिती अधिकार मागितली आहे. हातात माहिती आल्यानंतर पर्यटनाच्या कामात नेमका किती अपहार झाला हे उघड करू, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राउळ यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अपर्णा कोठावळे , प्रशांत कोठावळे, विनोद ठाकुर, गुणाजी गावडे, शैलेश गवंडळकर, आदी उपस्थित होते.