बेंगळूर : संपूर्ण देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. २००-२५० रुपये किलो भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. महागाईच्या या दिवसात टोमॅटोचे दर जणू चटके देत असताना मात्र, चक्क २ टन टोमॅटोने भरलेला बोलेरो पळविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बेंगळूरच्या आरएमसी यार्डमध्ये घडली.
चित्रदुर्ग येथील एका शेतकऱ्याने बेंगळूर येथील आरएमसी यार्डला टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. या दरम्यान तो शेतकरी चहा पिण्यासाठी बोलेरोतून खाली उतरला. भामट्याने ही संधी साधली आणि बोलेरोसह २ टन टोमॉटो घेऊन फरार झाला. या प्रकरणाची नोंद आरएमसी यार्ड पोलीस स्थानकात झाली आहे.
टोमॅटोची गणना नाशवंत पिकांमध्ये होते. शिवाय किडीची प्रादुर्भाव आणि खर्च ही मोठा येतो. मात्र म्हणावा तसा दर मिळत नाही. यंदा पाऊस लांबल्यामुळे आणि हवामान बदलामुळे टोमॅटोच्या उत्पादनात होती घट झाली आणि दर गगनाला भिडले. आता सर्वसामान्यांना हा दर परवडणारा नसला तरी, शेतकऱ्यांना मात्र मिळलेल्या या संधीचं सोनं होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान पाहायला मिळत आहे. मात्र बेंगळूरमध्ये शेतकऱ्यांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे टोमॅटो चोरीचे पण दिवस येऊ शकतात यावर लोकांचा विश्वास ठेवावा लागणार आहे. दरम्यान चित्रदुर्ग मधील शेतकऱ्याचा डोमॅटोने भरलेला बोलेरो पळवणारा चोर सापडला नाही तर या शेतकऱ्याला चार ते पाच लोकांचं नुकसान सहन करावं लागणार आहे.