प्रतिनिधी/ सातारा
राज ठाकरे हे एक नकलाकार आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, ते नकला छान करतात. थोडीशी नक्कल केली तर इंटरटेनमेंट होती. मला आवडली चांगली केली नक्कल? मी कौतुक करतो त्यांच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुरते वस्त्रहरण केले. दरम्यान, मशिदीवरील भोंग्याप्रश्नी ते म्हणाले, भाजपचे जेथे सत्ता आहे तेथे काय कृती केली हे त्यांनी तपासून आम्हाला कळवलं तर बरे होईल. तसे ते कोणाच्या हाताचे बाहुले आहे हे सर्व देशाला आणि राज्यातील जनतेला माहिती आहे, असा ही टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा सातारा जिल्हा दौऱयावर आली असताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, प्रदेशाध्यक्ष सलक्षणा सलगर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज ठाकरे नेमके काय म्हणाले आहे. काय त्यांनी अलटीमेंटम दिला आहे. भोंगे उतरवताना भाजपाचे जेथे राज्य आहे गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक असेल या ठिकाणी अशी काही कृती झाली आहे का हे त्यांनी तपासाव. तपासून आम्हाला कळवलं तर जास्त बरे होईल. राज ठाकरे हे सर्वांच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते का वेधून घेतात. ते कोणाच्या हातातले बाहुले झालेत हे सगळ्या देशाला, महाराष्ट्राला कळलेलं आहे. त्यांच्या विषयी जास्त बोलण्यासारख मला वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुढे राज ठाकरे यांच्यावर ते म्हणाले, नकलाकाराकडून वेगळ्या अपेक्षा काय करायच्या?, थोडीशी नक्कल केली तर इंटरटेनमेंट होती. मला आवडली त्यांनी चांगली केली नक्कल?, मी त्यांचं कौतुक करतो, अशा शब्दांत पुन्हा एकदा फिरकी घेतली.
चंद्रकांतदादा हिमालयात जात असतील तर मी येतो सोडायला
कोल्हापूर उतरच्या निकालावरून जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले. चंद्रकांतदादा हिमालयात जाणार असतील तर मला पण त्याच्याबर जायची इच्छा आहे. इकडे उकाडा वाढला आहे. मी सोडायला येतो असे म्हणत दादा म्हणत होते की मी उभे राहिलो असतो तर काय झालं असत. त्यांना उभे राहायला संधी होती. रहायचं होतं उभं, असे सांगत आम्हला सोयीचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दात त्यांनी फिरकी घेतली.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी हिताचे निर्णय
अनेक निर्णय शेतकरी हिताच घेतले आहेत. आलेल्या नैसर्गिक संकटात शेतकयांना मदत केली आहे. केंद्रातील सरकारने शेतकरी विरोधात काळे कायदे केले होते. आम्ही अर्थ संकल्पात रेग्युलर कर्ज भरतात. त्यांच्यासाठी तरतूद केली आहे. शेतकयांना साठी प्रचंड काम केले, असा दावा त्यांनी केला आहे.
मनसे आणि बीजेपी एकत्र आले तरी काही फरक फरक पडत नाही
मनसे आणि बीजेपी एकत्र आले तरी काही फरक पडत नाही. उलट भाजपला मुबंई मोठा फटका बसेल. मनसेची किती ताकद आहे. त्याचा फायदा काँग्रेस शिवसेनेला होईल, असा दावा ही त्यांनी यावेळी केला.