Radhakrushn vikhe patil –
काँग्रेस पक्षाच्या भवितव्यावर आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. पक्षासाठी काँग्रेसच्या नेतेमंडळींना स्वारस्य राहिले ना, पक्षनेतृत्वाला राहिले आहे. मागील अडीच वर्षात केवळ मंत्रिपदासाठी काँग्रेसचे अस्तित्व राहिलं होते. असं म्हणत सध्या काँग्रेसचे अस्तित्व राहिलंय कुठे? असे भाष्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. ते आज कोल्हापुरात आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
पुढे म्हणाले, वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. यातून गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याला थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. अवैध वाळू उपसा मधून निर्माण झालेल्या अनैतिक गोष्टी थांबवण्यासाठी हे सरकार प्राधान्य देईल विखे पाटील म्हणाले.