भारतात लोकांची उंची वाढण्याऐवजी कमी होतेय असा दावा करण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षात भारतातील पुरुष आणि स्त्रियांची उंची 1.10 सेंटीमीटरने कमी झाल्याचं आढळलं आहे.
1998 ते 2015 पर्यंत भारतातील प्रौढ उंचीचा कल याचा अभ्यास ‘राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण’ यामध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार 1998-99 या वर्षात भारतातील लोकांच्या उंचीमध्ये वाढ झाली आहे. तर प्रौढ पुरुष आणि महिलांची सरासरी उंची 2005-06 ते 2015-16 पर्यंत कमी होऊ लागली. उंचीतील सर्वात मोठी घट गरीब महिला आणि आदिवासी महिलांमध्ये दिसून आली.
ज्या मुलांची आई किंवा वडील उंचीने लहान आहेत, मोठे झाल्यावर त्या मुलांची उंचीही कमी होत आहे. यासोबतच जीवनशैली, पोषण, सामाजिक आणि आर्थिक घटकंही समोर आले. सर्वेक्षणानुसार 60-80 टक्के अनुवांशिक समस्या जबाबदार आहेत. त्याच वेळी, सुमारे 20-40 टक्के कारणं इतर आहेत.