ऑनलाईन टीम / तरुण भारत :
साडेतीनशे वर्षांनंतरही लोकांच्या मनात शिवरायाबद्दल प्रेम कायम आहे. त्यांच्या सन्मान व्हावा हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली हीच खरी शोकांतिका आहे. काही तुटपुंजे, फुटकळ आणि विकृत लोक अनावश्यक वक्तव्य करतात. नुपूर शर्माच्या विरोधात जशी कारवाई झाली. तशी राज्यपाल कोश्यारींवर का झाली नाही?, असा संतप्त सवाल खा. उदयनराजे भोसले (Udaynraje Bhosale) यांनी उपस्थित केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुणे बंदसह मूक मोर्चा काढण्यात आला. या मूकमोर्चात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली होती. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता झाली. यावेळी उदयनराजे बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, पक्ष ही दुय्यम गोष्ट आहे, राज्यपाल यांच्याबद्दल तातडीने भूमिका घ्यायला हवी. नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपालांना का हटवले नाही, त्यांना तोच न्याय का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अधिक वाचा : देवेंद्रजी, हे वाचाळवीर भाजपला बुडविल्याशिवाय राहणार नाहीत