आगामी प्रत्येक वर्षातील मार्च महिन्यात कोरोनाची किंवा नव्या विषाणूंची भीती कायम राहणारच का? तर याला तज्ञांचे उत्तर अंशतः ‘हो’ असेच आहे. याला सबळ कारणे दिली जात आहेत. लसीकरण होऊन संपलेला कालावधी, तिसऱया बुस्टरडोसची केलेली हेळसांड, आणि बरेच काही… यातून कोणत्याही लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित होते. जर हा संसर्ग टाळायचा असल्यास कोविड वर्तणुकीच्या आधीन राहूनच व्यवहार करावे लागतील. अन्यथा मृत्यूचे भय नसले तरी संसर्ग होणारच नाही याची खात्री कोणीच देताना दिसत नाही…
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपता संपता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाढीचा दर 3 टक्के असल्याचे सांगितले. यापुढील प्रत्येक महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती राहणारच का? या सर्वसामान्यांच्या शंकेला तुर्तास तज्ञांनी अंशतः ‘हो’ असेच उत्तर दिले आहे. जर हे टाळायचे असल्यास कोविड प्रोटोकॉलचे (मास्क पासून लसीकरणापर्यंत सर्वकाही) पालन करावेच लागेल. याला कारण म्हणजे राज्यातील लसीकरणाला आता दिड वर्ष उलटले असून लसीकरणामुळे निर्माण झालेली शरिरातील प्रतिपिंडे आता कमी झाली आहेत. त्यातही तिसऱया म्हणजेच बुस्टर डोस घेताना प्रत्येकाने हेळसांड केली. समुपदेशन तसेच आणि इतर संसर्गाच्या शक्यअशक्यता सांगूनही बुस्टर डोस टाळलेल्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे सुरु असलेल्या लसीकरणाला लोकांनी प्राधान्य द्यावे तसेच कोविड वर्तणुकीच्या अधीन राहूनच व्यवहार करावे लागतील असा इशारा राज्य कोविड टास्क फोर्सचे तज्ञ देत आहेत. राज्याच्या सर्वोच्च सभागृहात आरोग्य मंत्र्यांनी जबाबदारीने माहिती देताना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले. तुर्तास आरोग्य यंत्रणा कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता ठेवत असली तरी देखील जबाबदारी म्हणून कोविड प्रोटोकॉल पाळा अशा सूचना होत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ातच रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याचे पेंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. केंद्रात संबंधित विषयावर बैठका होऊ लागल्या. सज्जता आणि विविध उपाययोजनांचे मूल्यमापन करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या. सहा राज्यांमध्ये कोरोना आणि व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्याचे नमूद करण्यात आले. या सहा राज्यात महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात रविवार म्हणजेच 26 मार्च पर्यंत 3 हजार 45 एवढे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मार्च महिन्यातील दैनंदिन नोंद पाहिल्यास त्यातील वाढ स्पष्ट होते. जसे 10 मार्च रोजी 93 एवढी कोरोना नोंद दोन अंकात होती. तर पाच दिवसात म्हणजेच 15 मार्च रोजी 176 एवढी झाली. 20 मार्च रोजी किंचित कमी होत 128 एवढी झाली असली तरी आगामी दोन दिवसात म्हणजे 22 मार्च रोजी 334 तर 26 मार्च रोजी 397 अशी तिप्पट वाढ दिसून आली. ही वाढ पाचशेच्या घरात जाऊ नये अशी तज्ञांची आणि आरोग्य यंत्रणेची अपेक्षा आहे. राज्यात कोविड 19, एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्ल्यूएन्जा रुग्णांची वाढ पाहून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा स्पष्ट केला. या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांची मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. दरम्यान, आरोग्य यंत्रणा पुर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात 4 हजार पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकाऱयांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर, आजारी, वफध्द, अति झोपेच्या व्यक्ती आरोग्य कर्मचारी यांना मोफत लसीकरण केले आहे. प्रत्येक जिह्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरण, बूस्टर डोस देण्यासाठी प्रवफत्त करावे, असे आदेश दिले आहेत. लसीकरणाच्या उपलब्ध साठय़ाचा आढावा घेण्यात आल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले. तसेच नव्या व्हेरिएंटमुळे धोका वाढत आहे. राज्यातील एच1एन1 बाधितांची संख्या वाढत असून तिघांचा मफत्यू झाला आहे. तर एच3एन2 बाधित संख्या 195 असून त्यापैकी एकाचा मफत्यू झाला आहे. तर एन्फ्ल्यूएन्जाचे संशयीत रुग्ण 3 लाख 11 हजार 192 इतके आहेत. त्यामध्ये बाधित रुग्ण एच1एन1 चे 117 आणि एच3एन2 चे बाधित रुग्ण 249 इतके रुग्ण आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेले 160 रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये एच1एन1 मुळे मफत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन असून एच3एन2 मुळे एकाचा मफत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ज्या ठिकाणी कोविड रुग्णवाढ, नवे व्हेरिएंटचे रुग्ण आणि मृत्यू दिसून येत आहेत अशा राज्यांना केंद्र सतत सूचना देत आहे. यातूनच राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले जात आहेत. तोंडावर रुमाल, व्यक्तींमध्ये अंतर, सॅनिटाइझरचा वापर या त्रिसुत्रीचा वापर करावयाच्या सूचना पुन्हा पुन्हा दिल्या जात आहेत. त्याचवेळी तीव्र श्वसनाचा त्रास होणाऱया रुग्णांनी स्वतःहून गर्दीत जाणे टाळावे यासारखी आवाहने केली जात आहेत. यंत्रणेला रुग्ण वाढ रोखण्यासाठी चाचण्या तसेच संशयित नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसींग करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिक, अंथरुग्णाला खिळलेले रुग्ण, मधुमेही, रक्तदाबाचे तसेच कर्करुग्ण यासह मूत्रपिंडांचे आजार असलेल्या रुग्णांना मास्कचा वापर करण्यास सुचविले जात आहे.
शरिरातील प्रतिपिंड घटले
पुन्हा रुग्ण वाढ होणे, या वाढीला नवनव्या व्हेरिएंटची जोड असणे, तसेच लसीकरणाकडे तोंड फिरवणे हे सर्व एकाच वेळी घडून येत आहे. तसे पाहिल्यास ऋतू संक्रमणाच्या काळात फ्लूच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे मत डॉ. अविनाश सुपे यांनी मांडले. मात्र तिन्ही लसीकरणाला बऱयापैकी कालावधी उलटून गेल्याचे सांगत नवनव्या म्युटेशनमुळे देखील रुग्ण हैराण आहेत. अशावेळी सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले. कोविड काळात कोविड टास्क फोर्समधील तज्ञ वारंवार लसीकरणाच्या उलटून गेलेल्या कालावधीचा उच्चार करत आहेत. त्याचवेळी मुंबई महानगरपालिका करत असलेली प्रतिपिंडाची चाचणी ही आता सर्वसामान्यांमध्ये व्यापक केल्यास आताच प्रतिपिंडांची स्थिती अधोरेखित करु शकते.
नवनवे म्युटेशन आणि लसीकरणाला लोटलेला कालावधी हेच सध्या वाढत्या संख्येला कारण असल्याचे सांगण्यात येत आहेत. लसीकरणामुळे जी प्रतिपिंडे तयारी झाली होते, त्यातील काहींचे प्रतिपिंडे प्रमाण कमी सध्या कमी झाले आहेत. यातून रुग्ण वाढत आहेत. मात्र मृत्यू प्रमाण कमी असल्याने दिलासा मिळत असला तरी देखील आयसीयूमध्ये दाखल होणाऱया रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर प्रतिपिंडांच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण करणे आवश्यक असून सर्वसामान्यांनी लसीकरणाला महत्त्व देणे आवश्यक असल्याचेच स्पष्टपणे समोर येत आहे.
राम खांदारे