गाजलेली बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आडनाव का लावत नाही? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला आहे. मात्र, एका मुलाखतीत तिने याचे कारणच स्पष्ट केले आहे. आपल्याला लोकांनी पूर्ण नावाने कधीही ओळखू नये, अशी आपली भावना आहे. आपल्या वडिलांनी आपण लहान असतानाच आईला तलाक दिला होता. त्यामुळे वडिलांबरोबर आपले कधीही पटले नाही. म्हणून आपण कधीच आपल्या नावासमोर वडिलांचे नाव किंवा त्यांचे आडनाव लावत नाही. तब्बूचे पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाशमी असे आहे. तथापि, ती चित्रपट जगतात तब्बू या नावानेच प्रसिद्ध आहे. आपल्या मनात वडिलांबद्दल कोणतेही प्रेम किंवा आस्था नाही. कारण त्यांनी कधीही आपल्याला पित्याचे प्रेम दिले नाही, असे ती सांगते.
आपल्याला वडिलांची कधीच आठवण येत नाही किंवा आली तरी ती मी झटकून टाकते. त्यांना भेटण्याची इच्छा मला कधीही होत नाही. कोणत्याही परिस्थितीत वडिलांचे आडनाव लावलेच पाहिजेत, असे बंधन मी मानत नाही. आता मी माझ्या आयुष्यात सुस्थिर झालेली असल्याने पूर्वायुष्यात घडलेल्या घटना आता माझ्यादृष्टीने महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीत. तब्बू ही हिंदी चित्रपटसृष्टीत अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयाबरोबरच लुक्स आणि भूमिका जाणून काम करण्याची तिची क्षमता आहे. तिला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारही प्राप्त झाला आहे. नुकतीच तिची ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटातील भूमिका नावाजली गेली होती. आता ती अजय देवगण यांच्या ‘दृश्यम-2’ मध्ये दिसणार आहे. एकंदर तिला बरेच काम मिळत असल्याचे दिसून येते.