तालुका पंचायतमधील कारभार : अनेक कोपऱयांत पानाच्या पिचकाऱया : स्वच्छतेकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
तालुका पंचायतीचा कारभार सध्या मनमानीपणे सुरू आहे. येथील अधिकारी व कर्मचाऱयांवर कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुका पंचायतमध्ये कोपऱयाकोपऱयात पान खाऊन पिचकाऱया मारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे मारण्यात आलेल्या पिचकाऱया कधी स्वच्छ होणार? याकडे आता लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तालुका पंचायत कार्यालयाच्या डागडुजीचे काम करण्यात आले. त्यावेळी परिसरातील कागदपत्रे इतर ठिकाणी हलविण्यात आली. याचबरोबर इतर स्वच्छताही करण्यात आली. परिणामी, तालुका पंचायत कार्यालय चकाचक करण्यात आले. मात्र, थोडय़ाच दिवसांत काही कामे रेंगाळली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही अस्वच्छता दिसून येते. तालुका पंचायतीमध्ये येणाऱया नागरिकांनी कोपऱयाकोपऱयात पानाच्या पिचकाऱया मारल्याचे प्रकार घडले आहेत. ते स्वच्छ करण्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे.
भिंती स्वच्छ करण्याची मागणी
तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्याकडे दोन तालुक्मयांचा भार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची ओढाताण होत आहे. दरम्यान, त्यांनी अधिकाऱयांना सांगून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. मागील काही सदस्यांनी आपल्या स्वखर्चाने येथील अडगळीची खोली व पानाच्या पिचकाऱयांची स्वच्छता केली होती. आताही असाच केरकचरा येथे भरला आहे. दरम्यान, अशीच अवस्था सर्वत्र दिसून येत आहे. तेंव्हा याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता करावी व पानाच्या पिचकाऱयांच्या भिंती स्वच्छ कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
तालुका पंचायतमध्ये तालुक्मयातील अनेक नागरिक दररोज ये-जा करतात. दरम्यान, अस्वच्छता असल्यामुळे अनेकांना येथे येण्यासही टाळाटाळ करावी लागते. कागदपत्रांची दक्षता घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी गाठोडी बांधून ठेवल्याचे चित्र तालुका पंचायतमध्ये दिसून येते. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सर्वत्र अस्वच्छता…
तालुका पंचायत कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. लवकरच येथील स्वच्छता करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. त्या दृष्टीकोनातून ही स्वच्छता करण्यात आली. मात्र, तोपर्यंत इतरत्र कचरा पडत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तालुका पंचायतवर सध्या प्रशासकीय अधिकारीच कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक कामांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे.