केर गावात पुन्हा नुकसान
दोडामार्ग / प्रतिनिधी –
पाऊस सुरू झाल्यावर हत्ती कर्नाटकच्या दिशेने जातील हा प्राणी अभ्यासक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा निष्कर्ष होता. त्याला फोल ठरवत पाच हत्तींच्या कळपाने बारमाही वास्तव केर परीसरात ठेवले आहे. शिवाय गुरूवारी रात्री चार शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. वनविभागाने आता ठोस उपाय योजना करण्याची गरज असून शेतकरी चिंतातुर बनला आहे.