राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंसोबत वेळ आली तर काम करण्यास दाखवली उत्सुकता
रत्नागिरी प्रतिनिधी
जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय असा भेदाभेद न करता सर्वांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र तटकरेंबरोबर काम करण्याची वेळ आली तर पुढाकार घेईन असेही जाधव यांनी सांगितले.
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकांराशी त्यांनी संवाद साधला असता आमदार भास्कर जाधव यांनी भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य केले. या निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना येथील वस्तूस्थिती सांगण्याची जबाबदारी माझी जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी माझ्या बरोबर अन्य नेते आले तर ताकद निश्चितच वाढणार आहे. जिह्यात उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीचे आमदार शिंदे गटात गेले पण येथे मागील ग्रामपंचायत निवडणुकीत आमचेच पारडे जड राहीले आहे. गुहागरमध्ये सर्वच्या सर्व 9 ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या आहेत. आणि आता जाहीर झालेल्या निवडणुकीत 42 पैकी 38 ग्रामपंचायती उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहण्यासाठी आमचा ध्येय राहणार आहे. त्यावेळी त्या निवडणुकीत विजयी झालेले काही सरंपच विकासासाठी आमदार, पालकमंत्र्यांकडे जातीलही. मात्र ते कायम त्यांच्याकडेच राहणार राहतीलच असे नाही. काही ठिकाणी सरपंच एकटा तिकडे जाईल. मात्र गाव त्यांच्याबरोबर दिसणार नाही. जिह्यातील शिवसैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आजही ठाम असल्याचे आमदार जाधव यांनी सांगिलते. जिह्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आरपीआय या सर्व पक्षांना एकत्र बांधण्याचा माझा प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्याबरोबर काम करण्यासाठी वेळ आली तर पुढकार घेईन असेही आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेचा माज जनताच उतरवेल- आमदार भास्कर जाधव
राज्यातील सत्तांतरण विश्वासघाताने झाले आहे, वैधानिक मार्गाने नाही. मागील अडीच वर्षे सत्ता न मिळाल्याचा सुड शिंदेंना बरोबर घेऊन भाजप उगवत आहेत. त्यासाठी कायदा बाजूला ठेवला जात असून विकासासाठी सत्तेचा उपयोग न करता फक्त सुडासाठीच होत आहे. चरित्र्यहनाबरोबरच कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोधकांना नामोहर करण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे. हा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. भाजपच शिंदे गटाला सुरंग लावेल असे उध्दव बाळासोब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला.