नवी दिल्ली
देशामध्ये वाढत्या महागाईमुळे मोबाईल, फ्रिज आणि टीव्ही यांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. या कारणास्तव कंपन्यांनी उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे. इंडस्ट्रीच्या माहितीनुसार महागाईच्या कारणामुळे किमती सतत वाढत जात आहेत. ही स्थिती लक्षात घेत कंपन्या जुलैपर्यंत उत्पादनात 10 टक्के घट करतील असे सांगितले जात आहे. देशातील जवळपास सर्व मोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादनामध्ये बदल केला आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक कंपन्या आगामी काळात उत्पादन संख्येबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. चालू वर्षात मोबाईल फोन विक्रीत 30 टक्के घसरण राहणार आहे. यामुळेच कंपन्या आपल्या उत्पादनाचे उद्दिष्ट कमी करण्यावर भर देणार आहेत.