यावर्षी बळ्ळारी नाला परिसराला मोठा फटका बसण्याची भीती : गाळ-जलपर्णीने तुडुंब भरल्याने धोका : पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करण्याची मागणी
बेळगाव ; बळ्ळारी नाला म्हणजे शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, मजगाव, अनगोळ, येळ्ळूर, धामणे, बसवण कुडची या परिसराला एक शाप ठरला आहे. जलपर्णींबरोबरच कचरा व मातीचा गाळ साचल्याने तो पूर्ण बुजून गेला आहे. पावसाळ्यापूर्वी या नाल्याची खोदाई होणे गरजेचे होते. पण अजून खोदाई झाली नाही. यामुळे यावषीही नाला परिसरातील हजारो एकर शेतजमिनीला फटका बसणार यात शंका नाही. मागील सरकारने केवळ आश्वासने दिली आहेत. आता काँग्रेस सरकार सत्तेवर आले असून हे सरकार तरी बळ्ळारी नाल्याची खोदाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बळ्ळारी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. जलपर्णा वाढली आहे. तर आता आनंदनगरपासून बळ्ळारीपर्यंत मोठी गटार बांधण्यात आली आहे. याचबरोबर येळ्ळूर रस्त्यावरील सिद्धिविनायक मंदिरपासून बळ्ळारी नाल्यापर्यंत गटार बांधण्यात आली आहे. मात्र त्यामधून पाणी निचरा होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नाल्यामध्ये अनेकांनी माती टाकली आहे. त्यामुळे पाणी पुढे जाणे अवघड झाले आहे. वास्तविक प्रथम बळ्ळारी नाल्याची खोदाई होणे गरजेचे होते. मात्र खोदाई करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी पुढे जाणे अवघड झाले आहे. यावर्षी या परिसरातील शिवाराला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
बळ्ळारी नाला भरला माती-कचऱ्याने
बळ्ळारी नाल्यासाठी अनेक वेळा निधी मंजूर झाला. मात्र त्याचे काम योग्य प्रकारे झाले नाही. दरवषी थोडी खोदाई करायची. त्यानंतर ढुंकूनही पाहायचे नाही. काही शेतकऱ्यांनीही तर शेतातील माती बळ्ळारी नाल्यातच टाकून दिली. याच बरोबर येळ्ळूर रस्त्यावर तर या नाल्यातच कचरा फेकून दिला जात आहे. यामुळे हा नाला पूर्ण बुजला आहे. निचरा होत नसल्याने दरवषी नाल्याचे पाणी शिवारात शिरते. त्यामुळे वरील सर्व परिसरातील भात पीक पाण्याखाली जाते. परिणामी भात पीक कुजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मध्यंतरी या नाल्याच्या खोदाईसाठी कोट्यावधी ऊपये खर्च करण्यात आले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पाटबंधारे खाते आणि जिल्हा प्रशासन केवळ आश्वासने देत आहेत. आता नवीन सरकार तरी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाल्यावरच केले अतिक्रमण
या नाल्यावरच अनेकांनी अतिक्रमण केले आहे. काही जणांनी तर चक्क त्या ठिकाणी घरे बांधण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे सरकारी नाल्यावर अतिक्रमण होत राहिले तर शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. सध्या नाल्याला जलपर्णींचा विळखा पडला आहे. या जलपर्णींमुळे नाल्यातील पाणी अडून शिवारात जाणार हे निश्चित आहे. यावषी या नाल्याची खोदाई बारगळली आहे. त्यामुळे आता पुराचा धोका निर्माण होणार आहे. नाल्याची खोदाई करा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. खरोखरच जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर जिल्हा प्रशासन, लघुपाठ बंधारे खाते यांनी कायमस्वऊपी तोडगा काढावा. दोन्ही बाजूने काँक्रीट ओतून हा नाला स्वच्छ व मोठा करावा. यामुळे पाण्याचा निचरा होईल. याचबरोबर या पाण्याचा उपयोगही होईल. मात्र केवळ माती काढायची आणि त्यानंतर त्याकडे लक्ष द्यायचे नाही. अशा प्रकारामुळे केवळ सरकारचा पैसा एक प्रकारे पाण्यातच घालण्याचा प्रकार सुरू आहे. तो थांबवावा व कायमस्वऊपी मजबूत बांधकाम करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कायमस्वऊपी तोडगा काढण्याची मागणी
नाल्याच्या परिसरात काळी सुपीक जमीन आहे. त्यामध्ये बासमती, एंटाण, सोनम, इंद्रायणी या जातीच्या भाताचे उत्पन्न घेतले जाते. ही जमीन दुबार पिके देणारी आहे. पण दरवषी पाण्यामुळे भात पीक कुजून जात आहे. त्यानंतर कडधान्य पेरणीच्या वेळेला जमिनीतील पाणी जात नाही. पेरणीही खोळंबली जाते. एकूणचा दोन्ही पिकांचे नुकसान होत आहे. शेती असूनही कुचकामीच ठरू लागली आहे. तेव्हा कायमस्वऊपी यावर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.