श्रीलंकेचे नूतन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे प्रतिपादन, महागाई नियंत्रणावर भर
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेमध्ये नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देशाची सूत्रे हाती घेतली असून महागाई नियंत्रण आणि अर्थव्यवस्था सुधारणे याला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपले सरकार सर्वपक्षीय असेल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. नागरिकांचे मत विचारात घेऊन सरकार चालविले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या मंत्रिमंडळात 20 मंत्री असू शकतात.
अद्यापही श्रीलंकेत सरकारविरोधातील आंदोलन सुरूच आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राजपक्षे यांचे समर्थक रस्त्यावर येऊन गोंधळ घालत असल्याचा आरोप बुजुर्ग नागरिक करीत आहेत. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी मागच्या सरकारची धोरणे बदलण्याचे संकेत विक्रमसिंघे यांनी दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांची भेट विक्रमसिंघे यांनी घेतली.
भारताचे साहाय्य घेणार
नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना भारताविषयी अधिक सहानुभूती आहे, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे ते पंतप्रधानपदी सुरक्षित राहिल्यास भारताशी संबंध सुधारण्याची शक्मयता आहे. भारताने श्रीलंकेला 300 कोटी डॉलर्सचे अर्थसाहाय्य संमत केले असून अन्नधान्य पुरवठाही सुरू करण्यात आला आहे.