नेत्यांकडून मनधरणी, कार्यकर्त्यांचा दबाव, त्यामुळे न लढण्याचा निश्चय मोडण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या उमेदवारीवरून गोंधळाची स्थिती कायम आहे. परंतु पक्षाच्या अनेक नेत्यांना राहुल गांधी ऑक्टोबरमध्ये होणारी ही निवडणूक लढवतील, असा विश्वास आहे. राहुल गांधी हे आमची विनंती मान्य करतील, अशी शक्यता या नेत्यांनी व्यक्त केली आहे. नेते आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे राहुल गांधी न लढण्याचा आपला निर्धार सोडून देतील अशी शक्यता निर्माण झाली आहे, असे सांगण्यात आले.
राहुल गांधी हे विदेश दौऱयातून भारतात परतले आहेत. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी यासाठी पक्षाचे नेते आता प्रयत्न करत आहेत. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव झाल्यावर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गांधी कुटुंबातील कुणीच पक्षाचे नेतृत्व करणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
आता वेगळा सूर
राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याची चर्चा पक्षात सुरू असतानाच आता वेगळा सूर उमटू लागला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशाप्रकारचे प्रयत्न आता केले जात आहेत. राहुल गांधी या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा त्यांच्या एका निकटवर्तीयाने व्यक्त केली आहे. रविवारी महागाई विरोधात दिल्लीत होणारी रॅली आणि त्यानंतर ‘भारत जोडो यात्रे’ला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, यावर बरेच काही अवलंबून असल्याचे या नेत्याने म्हटले आहे.
गेहलोत हे पर्याय
गांधी-नेहरु घराण्यातील कोणी पक्षाध्यक्ष होणार नसेल तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे पर्याय ठरु शकतात अशी चर्चा काँगेसमध्ये आहे. राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणांपर्यंत सुरूच राहणार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे आणि सलमान खुर्शीद यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी तारखा घोषित झाल्या आहेत. काँग्रेस कार्यकारिणीकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना काढली जाणार आहे. तर 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. मतदान करविण्यात आल्यास 19 ऑक्टोबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.
मतदारयादी जाहीर करण्यास नकार
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर केली जाणार नाही. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्राr यांनी शनिवारी पक्षाचे नेते मनीष तिवारी अन् शशी थरूर यांची मतदारयादी जाहीर करण्याची मागणी फेटाळली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱया उमेदवारालाच मतदारांची यादी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. निवडणूक लढविणाऱया उमेदवाराला पूर्ण यादी दिली जाणार आहे. आम्ही सर्व डेलिगेट्सना (मतदार) ओळखपत्रे देणार आहोत असे मिस्त्राr यांनी म्हटले आहे. निवडणूक निष्पक्ष होणार नसल्याचे कुणाला वाट असेल तर त्याला मी समजावत बसणार नाही. मतदारयादीतील स्वतःचे नाव पडताळून पहायचे असल्यास प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन यादी पाहता येणार आहे. 9 हजारांहून अधिक मतदार आहेत असे मिस्त्राr म्हणाले.