प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील रस्त्यांची दुरूस्ती पावसाळय़ापूर्वी करण्याची मागणी करण्यात आली होती. पण पावसाळा संपला तरी अद्यापही रस्ते दुरूस्तीबाबत महापालिका प्रशासनाने कोणत्याच हालचाली चालविल्या नाहीत. परिणामी शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले आहेत. गोवावेस येथील बसवेश्वर चौकातील खड्डा तर अक्षरशः जीवघेणा बनला आहे. गतिरोधक शेजारी निर्माण झालेल्या खड्डय़ात दररोज शेकडो वाहन चालक घसरून पडत आहेत.
शहरातील रस्ते पावसामुळे वाहून गेले आहेत. नेहमीचे खड्डे पावसामुळे पुन्हा निर्माण झाले आहेत. रस्त्यांची अवस्था पाहता एकही रस्ता व्यवस्थित नसल्याचे निदर्शनास येते. शहरातील अंतर्गत रस्त्यासह प्रमुख रस्ते देखील मृत्यूचे सापळे बनले आहेत. अशी दयनीय अवस्था स्मार्ट सिटीतील रस्त्यांची बनली आहे. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहने चालविणे मुश्कील बनले आहे. वाहनांचे स्पेअरपार्ट खराब होतच आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. खड्डय़ामधून जाताना वाहन चालकांच्या कंबरेबरोबरच मनक्मयाची झीज मोठय़ा प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
खड्डे चुकविण्यास जाऊन अपघाताला सामोरे जावे लागत आहे. बसवेश्वर चौक येथे स्मार्ट बस थांबा निर्माण करण्यात आला आहे. पण बस थांब्यासमोरच असलेल्या गतिरोधकाजवळील खड्डा बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. प्रत्येक पावसाळय़ात या ठिकाणी खड्डे निर्माण होत असून या खड्डय़ामुळे अपघात होत आहेत. स्मार्ट शहराची संकल्पना राबविताना प्रथम नागरिकांना भेडसावणाऱया नागरी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. या खड्डय़ामुळे दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांचे देखील अपघात घडत आहेत. खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने दररोज शेकडो दुचाकी वाहनधारक खड्डय़ामध्ये अडकून पडत आहेत. पण याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही कोणतीच दखल घेतली जात नाही. महापालिकेच्या अभियंत्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. मृत्यूच्या सापळय़ामध्ये वाहनचालक अडकण्याच्या प्रतिक्षेत मनपाचे अधिकारी आहेत का? असा मुद्दा शहरवासीय उपस्थित करीत आहेत.