प्रतिनिधी /बेळगाव
अग्निपथ योजना सुरू केल्यामुळे तरुणांवर अन्याय झाला आहे. ही योजना पुन्हा बेरोजगारी वाढवणार आहे. सध्या देण्यात आलेली आश्वासने ही खरी ठरणारी नाहीत. तेव्हा तातडीने अग्निपथ योजना मागे घ्यावी, या मागणीसाठी भारतीय कृषक समाज संघटना व कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
देशामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये खासगीकरण केले जात आहे. खासगीकरणामुळे बेरोजगारी वाढत असताना देशाच्या संरक्षण करणाऱया दलांमध्येही गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. अग्निपथमुळे केवळ चार वर्षे तरुणांना नोकरी मिळणार, त्यानंतर ते बेरोजगार होणार आहेत.त्यामुळे सरकारने तातडीने ही योजना मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी भारतीय कृषक समाज संघटनेचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी, जयश्री गुरण्णावर, मंदा नेवगी, जी. एम. कुलकर्णी व शेतकरी उपस्थित होते.