सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी मांडले ठाण : अधिकाऱयांना धरले धारेवर
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरात 22 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अधिकाऱयांकडे अनेकवेळा विनंती अर्ज केला. पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी बुधवारी दुपारी कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली. सुरळीत पाणीपुरवठा करा, अन्यथा येथेच ठाण मांडू, अशी भूमिका घेतली.
कॅन्टोन्मेंटने पाणीपुरवठय़ात कपात केली होती. उन्हाळय़ात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. सध्या पावसाचा जोर वाढला असून राकसकोप जलाशय पूर्णपणे भरले आहे. तरीदेखील कॅन्टोन्मेंट परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. राकसकोप जलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून यापूर्वी पाणी कपात करण्यात आले. पण आता पाणीसाठा मुबलक असूनही पाणी कपात करण्यात आल्यामुळे संतापलेल्या महिलावर्गाने थेट कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद अनुपस्थित होते. त्यामुळे साहाय्यक कार्यकारी अभियंते सतीश मण्णूरकर यांना घेराव घालण्यात आला. पाणीपुरवठा कधी सुरळीत करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. घरपट्टी-पाणीपट्टी वेळेवर भरली जाते, तरी 22 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. असे विविध प्रश्न उपस्थित करून अधिकाऱयांना धारेवर धरले.