घाण्यावरील तेल आरोग्यासाठी वरदान
ऑनलाईन टीम/तरुण भारत
शेतीमध्ये आजच्या घडीला अनेक मोठे बदल झाले आहेत. आज अनेक जण शेतीपूरक व्यवसायाकडे वळाले आहेत तसेच प्रक्रिया उद्योगदेखील उभारत आहेत. वाढते प्रदूषण आणि डिजिटल युगात आज लोक सेंद्रिय पध्दतीने पिकविलेल्या पदार्थांवर जास्त भर देत आहेत. त्यामुळे जुन्या शेतीपध्दतीचा देखील अनेक जण अवलंब करून लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. आज आपण अशाच एका प्रक्रिया उद्योगविषयी आणि आरोग्याला फायदेशीर असणाऱ्या खाद्यतेलाविषयी माहिती घेणार आहोत.
लाकडी घाणा तेल उद्योग हा तास पारंपरिक चालत आलेला व्यवसाय आहे पण मधल्या काळात रिफायनरी तेलाच्या वापरामुळे हा उद्योग जवळजवळ संपला होता पण आताच्या परिस्थिती मध्ये याला परत चांगले दिवस येत आहेत. केमिकल विरहित तेल वापरणे आज लोक जास्त पसंद करतात लाकडी घाणा म्हणजे ज्या घाण्यातून तेल काढले जाते ते तेल काढण्यासाठी लाकडी भागाने ते तेल वेगळे केले जाते. पूर्वी बैलाच्या उपयोग करून घाणे फिरवले जायचे. आता याची जागा मोटार च्या साहाय्याने घेतली आहे.
लाकडी घाण्यावरील तेल आरोग्यासाठी चांगले आहे. यात कुठल्याही प्रकारचे केमिकल नसते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जे तेल निर्मिती होते, त्यात काही प्रमाणात तरी याचा मारा होतो. त्यातून मग आरोग्यासंबंधीचे अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे भविष्यात गाण्यावरील तेलाला मागणी वाढू शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिल्यास घाण्यावरील तेल आणि लाकडी घाण्यावरील तेल व्यवसायाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.
घाण्याच्या तेलाकडे वाढता कल
प्रत्येक तेल कंपन्या आमच्याच कंपनीचे तेल सर्वोत्तम कसे हे दाखवण्यासाठी चढाओढ करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती आणि आधुनिक जीवनशैली यामुळे तेल आपल्या आरोग्यास घातक कसे याचाही पर्यायाने शोध लागला. मग हेल्थी ओईल, हृदयासाठी वेगळे तेल, मधुमेहींसाठी वेगेळे तेल असे नाना प्रकारचे तेल बाजारात येऊ लागले आहते.पण जुन्या काळात लाकडी घाण्यावर काढले जाणारे तेल हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे लक्षत येत आहे. यामुळे नागरिकांचा कल पुन्हा याकडे वळत आहे.
घाण्यावर काढलेल्या तेलाला नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये लाकडी घाण्यावरील तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्यावरील तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबाबतच्या जागरुकतेचा नवीन ट्रेंड उदयास येत आहे.
तेलाची जस जशी मागणी वाढत गेली, तास तेलाचा व्यापारही वाढीस लागला त्याचबरोबर जास्त नफा मिळवण्यासाठी तेलामध्ये भेसळ आणि रसायनांचा वापर होऊ लागला. इथूनच सुरुवात झाली ती आपल्या आरोग्याच्या काळजीची. काही लोकांच्या हे लक्षत आल्यानंतर अनेकांनी घाण्यावरील तेलाला पसंती देण्यास सुरुवात केली. आपण कोणतं तेल वापरावं याचा विचार केल्यास नक्कीच लाकडी घाण्यावर काढलेल्या तेलाला पहिली पसंती द्यायला हरकत नाही.
लाकडी तेल घाण्यावरील तेल आरोग्यासाठी फायदेशीर…
फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खाद्यतेल गरजेचे असते. खाद्यतेल आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणते खाद्यतेल आहारात वापरायला हवे हेदेखील महत्त्वाचे ठरते. सध्या कच्ची घाणी तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबियांचे लाकडी घाणीमधून तेल काढले जाते. लाकडी घाणीमधून तेल काढताना कमी दाब व तेलाचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते. कमी तापमानात तेल काढल्यामुळे रंग, चव, सुगंध, अॅण्टिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक टिकून राहतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच घाण्यावर काढलेल्या तेलाला मागणी वाढली आहे. तर घाण्यावर काढलेल्या तेलामध्ये कुठल्याही प्रकारचे अॅडेसिव्ह नसतात. तेलाचे नैसर्गिक स्वरूप कायम ठेवण्यात येते. मुख्य म्हणजे रिफाइंड ब्राण्डेड तेलाच्या तुलनेत दर कमी असल्याने महिन्याकाठी चाळीस टक्के बचत सहज शक्य आहे. रिफाइंडच्या तुलनेत घाण्यावरील तेल कमी लागत असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे.’
चरबी कमी करण्यास उपयुक्त
घाण्यामध्ये काढलेल्या तेलात अनेक प्रकारचे पोषक घटक आणि आवश्यक खनिजे नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. या तेलामध्ये कुठलीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसल्यामुळे हे तेल चवीसाठी आणि खाण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. या प्रकारच्या तेलातील चिकटपणामुळे शरीराला आवश्यक असणारे स्निग्ध आम्ल, जीवनसत्व-ई आणि खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते.
घाण्यावरील तेलाचे फायदे…
कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पुर्णपणे नैसर्गिक व शास्त्रोक्त पद्धतीने तेली निर्माण केले जाते.
शुद्ध तेलाचा वास येतो कारण त्या तेलात ४ ते ५ प्रकारची प्रोटीन्स असतात, तो प्रोटीन्सचाच गंध असतो.
शुद्ध तेलाचा चिकटपणा खुप असतो. कारण त्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे फॅटी अॅसिड असते, व्हिटॉमिन ई व मिनिरल्स सुद्धा असतात.
लाकडीघाण्यावरचे तेलच सर्वोत्तम. कारण तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना तेलातील एकही नैसर्गिक घटक कमी होत नाही.
आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हाय डेन्सिटी लीपोप्रोटीन (एच डी एल) हा आपला लिव्हर मध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ले तरच तयार होतो, म्हणुन शुद्ध तेल खावे.
शुद्ध तेल खाल्याने शरीराला वात हा दोष संतुलित राहतो व त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत.
हार्डअॅटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीस, सांधेदुखी, पॅरलिसिस, ब्रेन डॅमेज सारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे.
लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० अंश पेक्षा जास्त होत नाही त्यामुळे त्यातील कोणताही नैैसर्गिक घटक नष्ट होत नाही. आपल्याला ते सर्व घटक मिळतात की ज्या घटकांची गरज आपल्या शरीराला असते.