प्रतिनिधी / बेळगाव : नागरिकांचा समावेश असलेला वार्ड कमिटीची स्थापना महापालिकेत करावी असा आदेश 2016 मध्ये महापालिका नगरविकास खात्याने बजावला आहे. सदर आदेशानुसार प्रत्येक वार्डमध्ये वार्ड समितीची स्थापना करावी अशा मागणीचे निवेदन यापूर्वी महापालिकेला देण्यात आले होते. मात्र याची दखल घेण्यात आली नसल्याने गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. समस्त नागरिकांच्यावतीने निवेदन देऊन नगर प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी विनंती आयुक्तांनी केली आहे.
यापूर्वी निवेदन दिले असता नगरसेवकांची शपथविधी झाली नसल्याने वार्ड कमिटीची स्थापना केली नसल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. पण नगरसेवकांची निवड झाल्यानंतर समितीची स्थापना करण्यात कोणतीच अडचण नाही. नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली दहा नागरिकांचा समावेश असलेली समिती प्रत्येक वार्डमध्ये स्थापन करणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.