प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्या निर्देशानुसार म्हाऊस पंचायत परिसरातील धोकादायक झाडे हटविण्याचे काम जोरात सुरू केले आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंचायतीचे प्रशासक गुरुदास गोखले व पंचायतीचे सचिव संदीप हल्लाळी यांनी केले आहे.
पावसाळी मोसमामध्ये रस्त्याच्या बाजूला व अनेक घरांवर धोकादायक झाडे असतात. वादळी वारा झाल्यास ही धोकादायक झाडे पडून मोठय़ा प्रमाणात नुकसान व वाहतूक ठप्प होते. याची दखल घेऊन सत्तरीचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी सर्व पंचायतींना पंचायत क्षेत्रातील धोकादायक झाडे त्वरित हटविण्यात यावी व याची ताबडतोब अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार म्हाऊस पंचायत क्षेत्रातून धोकादायक झाडे हटविण्यास सुरुवात झाली आहे.
पंचायतीचे कर्मचारी सुभाष गावकर विशेष सहकार्य करीत आहेत. सत्तरी तालुक्मयाचे गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांनी यासंदर्भात विशेष आदेश जारी केले होते. उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्या निदेशानुसार सर्व पंचायतीने त्याचे पालन करावे असे आवाहन गटविकास अधिकाऱयांनी विनंती पत्रात केले होते. त्यानंतर ही प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे सचिव संदीप हल्लाळी यांनी स्पष्ट केले.