पक्ष्यांच्या किलबिलाटाने येणारी जाग! सुंदर भूपाळीने सुरू होणारी सकाळ, एकमेकांशी बोलत राहणारी घरातली माणसे, कामावर साहेबांनी दिलेल्या सूचना, रस्त्याने जातांना सावध करणारे हॉर्नस्, लंचमध्ये मित्रांशी मारलेल्या गप्ण, भिशीतील मैत्रिणींचे गॉसीप, रात्री भावा-बहीणींशी, नातेवाईकांशी फोनबरून झालेली भेट. या सगळ्या गोष्टी आपण लिलया करत जातो, ते एका आपण न पाहू शकणाऱ्या अवयवामुळे! तो म्हणजे कान! आज जागतिक श्रवण दिन (World Hearing Day) त्यानिमित्ताने…
श्रवण दोषामध्ये अनेक नवीन दोष समोर येत आहेत जसे अतीतीव्र लहरींच्या दोष, श्रवणशक्ती उत्तम असली तरी गोंगाटात शब्द दोष, संगीताचा अतिरेक होऊन निर्माण होणारा दोष. यातील सर्वात मोठे बदल दखल घेण्यासारख्ये संशोधन म्हणजे दुर्लखित श्रवणदोषामुळे विस्मरणासारखे रोग बळावण्याचा धोका आहे.
नेहमीच दुर्लक्षलेला पण बुध्दिमत्तेची कवाडे उघडणारा असा हा ज्ञानचक्षू म्हणजे आपली श्रवणशक्ती! श्रवणशक्तीचा इतर प्राण्यांमधील विकास पाहिला तर दुरून न दिसणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि काही विशिष्ट आवाज काढून इतर भाऊबंदासोबत संवाद साधणे. परंतू माणसामध्ये या श्रवणक्षमतेचा उच्चांक आहे त्यात सर्व प्रथम येते भाषा! भाषा समजणे व बोलता येणे हे केवळ आणि केवळ श्रवणावर आधारीत आहे. त्यामुळे आपण आपले विचार, भावना एकमेकांना सांगू शकतो. दुसरे आहे, संगीत! तर अशा या अमुल्य अशा देणगीचे आपण काय करतो? कानात काड्या, पेन, किल्ल्या घालतो, कधी शिक्षक, घरातली मोठी माणसे लहानांच्या सरळ कानावर मारतात. आपण जोरजोरात फटाके लावतो मोठ्यामोठ्याने गाणी लावतो, वाद्य वाजवतो, सतत हेडफोन वापरतो. जराही आपण विचार करत नाही कि कानांना माझ्या काही झाले तर! माझ्या श्रवणतज्ञ म्हणून 33 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक जण पाहिले आहेत की, श्रवणशक्ती गमावल्यावर ती परत मिळवण्यासाठी खूप धडपडतात पण अजूनही निसर्गासारखा कान बनवणे कोणत्याही तंत्रज्ञानालाही शक्य नाही! एवढे मात्र नक्की की पूर्वीच्या तुलनेत तंत्रज्ञान मग ते श्रवणयंत्र असो अथवा कॉक्लिअर इम्प्लांटमधील असो. ते दिवसेंदिवस सुधारत आहे. आज नवीन नवीन शोध आम्हां श्रवण तज्ञांच्या ज्ञानात भर घालत आहेत. पूर्वी फक्त बाह्य-मध्य व अंतकर्णापर्यंत असणाऱ्या चाचण्यांच्या जोडीला आम्ही आता मध्य मेंदू व मेंदूतील श्रवणाचे सर्वोच्च केंद्रही साध्या सोप्या तपासण्यांद्वारे तपासू शकतो.
श्रवण दोषामध्ये अनेक नवीन दोष समोर येत आहेत जसे अतीतीव्र लहरींच्या दोष, श्रवणशक्ती उत्तम असली तरी गोंगाटात शब्द दोष, संगीताचा अतिरेक होऊन निर्माण होणारा दोष. यातील सर्वात मोठे बदल दखल घेण्यासारख्ये संशोधन म्हणजे दुर्लखित श्रवणदोषामुळे विस्मरणासारखे रोग बळावण्याचा धोका आहे. यासाठी मग काय करावे तर कानाची उत्तमरित्या निगा राखणे, वेळीच औषगोपचार करणे, 25 वर्षानंतर नियमित ऐकण्याची तपासणी करणे, गोंगाटात जाताना इअरप्लग वापरणे, दुचाकीवर हेल्मेट वापरणे, फोनचा सतत वापर टाळणे आदी गोष्टींबाबत जर आपण जागरूक राहिलो तर आपले हे कान आपल्याला आयुष्यभर उत्तम साथ देतील हे नक्कीच! जपा आरोग्य कामाचे, मिळेल सुख श्रवणाचे! – शिल्पा हुजूरबाजार, ऑडिओलॉजिस्ट