दोन दिवसांत चौघांच्या आत्महत्या : नागरिकांमधून होतेय हळहळ व्यक्त
प्रतिनिधी/ सातारा
कोरेगाव शहरात एकाच फ्लॅटमध्ये एकाची गळफास व दुसऱ्या मृतदेह जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने चांगली खळबळ उडाली. तोच मंगळवारी सातारा शहरातील गुरूवार पेठ व शाहूपुरीतील दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. जिह्यात गेल्या काही दिवसांपासून तरूणांच्या आत्महत्याचे सत्र वाढत आहे. या आत्महत्याचे कारण मानसिक ताणतणाव की आणखी काय याचे कारण अस्पष्ट आहे. परंतु जिह्यात तरूणांची आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील 720 गुऊवार पेठ येथे रहाणारा ऋतिक आनंदा वायदंडे (वय 24) याने उंबराच्या झाडास मंडपाच्या कापडाने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची बाब मंगळवारी सकाळी 8 वाजता स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. तो मंडप डेकोरेशनच्या कामासाठी जायचा. त्याचा मित्रवर्ग मोठा होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा ऊग्णालयात करण्यात आली असून याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
14 वर्षाच्या मुलाची आत्महत्या
तसेच शाहुपूरीत राहणाऱ्या नवीतील विद्यार्थ्यांने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी दहा वाजता घडली. अर्थव बसवराज दोडामणी असे त्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो सकाळी क्लासवऊन घरी आला आणि घरातच त्याने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची बाब त्याच्या कुटुंबियाने समजताच त्याच्या आक्रोश सुऊ केला. अर्थव हा अभ्यासात हुशार होता. नेमके असे काय झाले की त्याने गळफास घेवून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. त्याच्या मृतदेहावर जिल्हा ऊग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
कोरेगावात दोघांचा संशयास्पद मृत्यू
कोरेगाव शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शेती उत्पˆ बाजार सा†मती अर्थात मार्केट यार्ड समोर असलेल्या अनन्या रा†सडेन्सी या इमारतीतील ा†तसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुभाष कुमार प्रसाद व ऋषीकेश ताटे असे त्यांची नावे आहेत. त्यातील एक जणांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत तर दुसऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना साधारणत: रा†ववारी मध्यरात्री घडली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जिह्यातून होतेय हळहळ व्यक्त
कोरेगावातील एका प्लॉटमध्ये एकाने गळफास घेऊन तर दुसऱ्याचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत अढळल्याने जिह्यात एकच खळबळ उडाली होती. सातारा शहरातील गुऊवार पेठेतील 24 वर्षांच्या युवकाने उंबराच्या झाडास मंडपाच्या कापडाने गळफास घेतला तर शाहुपूरीतील नववीतील एका विद्यार्थ्यांने घराताच आत्महत्या केली आहे. मात्र दोन दिवसांत चौघांनी आत्महत्या केल्याने जिह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. मात्र सदर आत्महत्यांच्या घटना कशामुळे घडत आहेत याचा आगामी कालावधीत शोध घेणे गरजेचे आहे.