मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन. शेती पडीक न ठेवता स्वयंपूर्ण बना. गोधन सेंद्रिय शेतीसाठी प्राधान्य द्या. मये मतदारसंघात तीन बंधाऱयाच्या कामाची पायाभरणी.
डिचोली / प्रतिनिधी
गोव्यातील युवकांनी तांत्रिकदृष्टय़ा शेतीमध्ये पारंगत होऊन शेतीच्या भरभराटीसाठी योगदान द्यावे. शेतीच्या माध्यमातून भरपुर पिके घेऊन घर समृद्ध करण्यासाठी शेतकऱयांनी स्वयंपुर्ण बनावं. शेती पडीक न ठेवता कम्युनीटी फार्मिंग करण्यावर भर द्यावे. काजु बागायतीकडे प्राधान्य देताना हळद लागवड करावी. वेगवेगळय़ा पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱयांनी पुढे यावे. शेतात गोधन तसेच सेंद्रिय खताचा वापर केल्यास चांगल्या दर्जाचे तांदूळ विकसीत होणार. प्राकृतिक शेतीच्या माध्यमातून भरपुर पिके घेण्याची तयारी ठेवावी. मयेवासियांना घरांच्या सनदी बरोबर शेतीच्या सनदीही लवकरच मिळणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ। प्रमोद सावंत यांनी मये येथे केले.
मये मतदारसंघातील तीन प्रमुख खाजन शेतीच्या बंधारे बांधकामाची पायाभरणी सोहळय़ात मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सुमारे 15 कोटी रूपये खर्चुन सावनवाडा मयेतील मुळाख खाजन, नार्वेतील डिग्गी खाजन आणि चोडण येथील माकाझन खाजन बंधाऱयांच्या बांधकाम करण्यात येणार आहे. पायाभरणी समारंभ मये पंचायतीच्या सभागृहात संपन्न झाला. या सोहळय़ास खास निमंत्रित पाहुणे म्हणून कृषीमंत्री रवी नाईक, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, जि.पं. सदस्य शंकर चोडणकर, कृषी खात्याचे संचालक आल्फांसो, मयेचे सरपंच दिलीप शेट, चोडणचे सरपंच पंढरी वेर्णेकर, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर तनही पंचायतीचे उपसरपंच, खाजन समितीचे अध्यक्ष यशवंत कारभाटकर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
सरकार शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत असून त्याचा लाभ शेतकऱयांनी घ्यावा. किसान कार्ड, किसान पेडिट कार्ड, शेतजमीन तपासणी कार्ड सर्व शेतकरी बंधूनी करुन घ्यावे. शेतकी खात्याने राबविलेल्या किसान पेडिट कार्ड अंतर्गत एक लाख रुपये कर्ज दिले जाते. प्रत्येकाने शेत जमीनीचे तपासणी करून घ्यावी. सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असून सरकारी योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा. गोव्याच्या युवकांना शेतीमध्ये गोडी लागावी यासाठी गोवा वेल्हा येथे शेतकी काॅलेज सुरु करण्यात आले आहे. त्याच लाभ नवयुवक शेतकऱयांनी घ्यावा, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
आजच्या पिढीला शेती व्यवसायात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आमच्या पुर्वजांनी काबाडकष्ट करून डोंगर कपारीत समुद्राला बंधारे घालुन शेतजमीन तयार केली आहे. तिचं जतन करणे आपले कर्तव्य आहे. शेतजमीनी जे कसतात त्यांनाच मिळाव्यात म्हणुन मी मुख्यमंत्री असताना गोव्यात कुळ कायदा आणला. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावा. खाजन शेतीच्या संवर्धनासाठी बंधारे आणि मानसांची पुनर्बांधणी करण्यासाठी शेतकी खाते कोटय़ावधी रुपये खर्च करते. शेतीमध्ये खारे पाणी घुसून खाजन शेतीची नुकसानी होत होती. ती आता आटोक्मयात आणली गेली आहे. याची परतफेड शेतकऱयांनी शंभर टक्के शेती लागवड करुन करावी. असे यावेळी कृषिमंत्री रवी नाईक यांनी म्हटले.
आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले की, मये हा शेतीप्रधान गाव असून खाजन शेतीच्या संवर्धनासाठी आज बंधाऱयांच्या बांधकामांस सुरुवात झाली आहे. मयेच्या शेती इतिहासात हा सुवर्णाचा क्षण असून बऱयाच वर्षांपासूनची मागणी आज बंधाऱयांचे काम सुरू झाल्याने पुर्णत्वास आली आहे. नवयुवकांनी शेतीमध्ये उतरावे. मये मतदारसंघात शेतीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध होऊया. मयेचा स्थलांतरीत मालमत्ता प्रश्न तडीस लागला असून याचे श्रेय आमचे सरकार आणि मुख्यमंत्री डाॅ सावंत यांनाच जाते.
यावेळी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मये मतदारसंघातील शेतकऱयांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास चोडणकर, स्वागत श्री. आल्फांसो यांनी तर आभार शंकर चोडणकर यांनी मानले.