अध्याय एकोणीसावा
माझी भक्ती करणे हाच सर्वश्रे÷ धर्म होय हे भगवंतांचे अत्यंत सुस्पष्ट प्रतिपादन ऐकून उद्धव चकित झाला. पुढे त्याने असा विचार केला की, ‘धर्म’ आदिकरून चार शब्दांचा अर्थ श्रीकृष्णनाथांनी फारच विलक्षण सांगितलाय तसाच आता यमादिकांचा अर्थही देवालाच प्रत्यक्ष विचारावा म्हणजे तो त्याचा गुप्तार्थ सांगेल. हे मनात आणून परमार्थ पूर्णपणे ध्यानात येण्यासाठी उद्धव आपण होऊनच यमादिकांचे प्रश्न विचारू लागला.
पुढील पाच श्लोकांमध्ये उद्धवाने गहन ज्ञानाचे पस्तीस प्रश्न विचारले आहेत. त्यांची भगवंतांनी दिलेली उत्तरे ऐकली असता जीवाचे आणि शिवाचेही समाधान होईल. या प्रश्नांच्या उत्तरातून माणसाची आदर्श जीवनप्रणाली कशी असावी याचे प्रत्यक्ष भगवंतांकडून मार्गदर्शन मिळेल अशी उद्धवाची मनीषा आहे. जेणेकरून त्यानुसार आचरण करून मनुष्य ईश्वराला प्रिय होईल व अंतिमतः त्याच्यात सामावला जाईल. म्हणून उद्धवाने भगवंतांना विनंती केली की, हे भक्तवत्सल प्रभो! आपण माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या त्याचबरोबर यांच्या विरोधी जे पदार्थ आहेत, त्यांच्याविषयीही सांगा. त्यातील लौकिक अर्थाहून भिन्न आणि परमार्थाला साधनीभूत होईल असा अर्थ स्पष्ट करून सांगावा. साऱयाचा मतितार्थ असा की, ह्या प्रश्नांचा परमार्थपर अर्थ सांगावा.
संतमूर्ति ज्ञानाने ज्ञानसंपन्न असतात, पण त्यांचाही तू स्वामी आहेस. म्हणून हे श्रीपते ! परमार्थप्राप्तीसाठी माझ्या प्रश्नांचे यथार्थरीतीने उत्तर सांगा अशी विनंती.
ही भक्ताची विनवणी श्रवण करून नारायणाला कृपा उत्पन्न झाली. यास्तव त्याच्या त्या परमार्थपर प्रश्नांचे उत्तर श्रीकृष्ण स्वतः सांगतील. प्रथम श्रीकृष्ण ‘यम’ आणि ‘नियम’ हे विशद करतील आणि बाकीचे जे अत्युत्तम प्रश्न आहेत ते श्रीकृष्ण अध्यायाच्या अखेरपर्यंत सांगतील.
ते म्हणाले म्हणाले, अहिंसा, सत्य, चोरी न करणे आसक्ती नसणे, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे ‘यम’ होत. कायावाचामनेकरून परपीडा न करणे ह्याचे नांव ‘अहिंसा’. खरे असेल तसेच बोलणे याचे नाव ‘सत्य’.
हाताने चोरी करावयाची नाही इतकेच नव्हे, तर दुसऱयाच्या द्रव्याचा मनातसुद्धा अभिलाष न धरणे हेच अस्तेय म्हणजे चोरी न करणे. लोक यात्रेला जातात तेव्हा तेथे जमलेल्या लोकांची संगत कायम लाभावी अशी आसक्ती त्यांना असत नाही, त्याप्रमाणे घरदार असूनही भक्त मनात त्यांची आसक्ती ठेवत नाही. स्फटिक ज्या रंगावर ठेवावा, त्यासारखाच तो बाहेरून दिसू लागतो पण अंतरांतून तो निर्विकारच असतो. त्याप्रमाणेच जो शरीरात राहतो, त्याला ‘असंगता’ म्हणतात. निंद्यकर्माचा मनापासून कंटाळा असणे आणि लौकिकामध्ये निंद्यकर्माला लाजणे, यालाच लज्जा
म्हणतात.
इहलोकात संग्रह करायचा त्याला माहीतच नसते कारण धनप्राप्ती हे केवळ प्रारब्धाधीन आहे असे तो जाणतो, तसेच स्वर्गातील सुखोपभोगाकरिता जो पुण्याचाही संग्रह करीत नाही कारण पुण्याने स्वर्गभोग प्राप्त होतात पण त्याच पुण्याचा क्षय झाला की, पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
म्हणून जेणेकरून पुण्यसंपत्तीचा क्षय होईल अशा कोणत्याही वस्तूचा माझा भक्त संग्रह करत नाही. याचेच नाव ‘असंचय’ म्हणजे संग्रह न करणे होय. आता ‘आस्तिक्मयाचे’ लक्षण म्हणजे माझे अस्तित्व सदैव मान्य करणे. त्यामुळे सर्वत्र सर्व ठिकाणी माझे ब्रह्मस्वरूपच व्यापलेले आहे असे पाहणे. ब्रह्माचा अभाव तो कुठेच पाहत नसतो.
आता येथे ‘ब्रह्मचर्य’ म्हणजे, आश्रमानुसार शास्त्रात जो आचार सांगितलेला आहे, तोच निश्चयाने आचरणे. मौन म्हणजे बिलकुल न बोलणे असा समज आहे पण शास्त्रानुसार खोटे आणि अनुचित भाषण न करणे हेच ‘मौन’ होय. नित्य वेदपठण, गायत्रीस्मरण किंवा भगवंताचे नामस्मरण करीत असावें हेही मौनच होय.
वृत्ती आत्मस्वरूपामध्ये, स्वधर्मामध्ये किंवा साधूच्या संगतीत स्थिर असणे ह्याचेच नांव ‘स्थिरता’ होय.
क्रमशः