जागतिक स्तरावर, देश स्तरावर आणि स्थानिक स्तरावर जल उपलब्धतेचे सर्वेक्षण केले जाते. जे जलस्त्राsत आहेत, त्यात वर्षभर असणारे पाणी ऋतुमानानुसार जल प्रमाणात होणारा बदल व पाण्याचा दर्जा याचा विचार केला जातो. एखाद्या नदीत वर्षभर व ऋतूनुसार कोठे व किती पाणी उपलब्ध असते ? त्या नदीला पाणी कोठून येते ? नदीप्रमाणेच नैसर्गिक तळी व तलावांचा विचार होतो. नैसर्गिक तळी क्षारमुक्त असल्याने त्याचा उपयोग होतो. तसेच प्रदूषणामुळे नदी व तळय़ांचा पाण्याचा दर्जा कमी होतो. भरपूर पाण्याची उपलब्धता म्हणून गंगा, सिंधू, कावेरी, ब्रम्हपूत्रा, कृष्णा, गोदावरी, नर्मदा ही भारतातील खोरी प्रसिध्द आहेत.
आता आपण उपलब्धता बघितल्यावर गरजांचा अंदाज बघावयास हवा. प्राचीन संस्कृती नदीकाठावर विकसित झाल्या. तंत्र प्रगतीने नदी नसलेल्या भागातही मानवी वस्त्या वाढल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे, शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे, पाण्याची गरज वाढली. त्यात स्थलांतरीतांमुळे भर पडते. पाणी पुरवणाऱया व्यवस्थापनेसमोर प्रश्न निर्माण होतो. अडचणी निर्माण होतात. मग संघर्ष सुरू होतो. आपल्याकडील कृष्णा-कावेरी पाणी तंटा सुरूच आहे किंवा इतर स्थानिक स्वरूपातील जलवाटप संघर्ष चालूच असतात.
नव्या तंत्रानुसार सागराचे क्षारयुक्त पाणी शुद्ध करून वापरण्यास मध्यपूर्व राष्ट्रात सुरूवात झालीच आहे. तसेच गंगा – कावेरी नद्या जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारत सरकारने हाती घेतला आहे. आपण जलउपब्धता पाहिली. त्यांच्या गरजांचा अंदाज पाहून जलाचे योग्य वाटप झाले पाहिजे. उपलब्ध जलानुसार जलपुरवठय़ासाठी नदीवर धरणे व पाझर तलाव बांधणे, कालवा किंवा नळाने पाणी पुरवणे, उपसा, जलसिंचन. स्पिंकल, ठिबक सिंचन, डबे व कावडीने पाणी पुरवणे यापैकी स्थानिकदृष्टय़ा जी पद्धत योग्य असेल तिचा अवलंब करणे व पाणी पुरवण्याचे प्रमाणही ठरविले जाते.
हे सर्व करत असताना आपणाला कोणत्या अडचणी येतील, त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो? याचा आपण विचार करायलाच हवा. अडचणी निर्माण करणारा मानवच असतो व त्यावर तोडगा काढणाराही मानवच आहे. सर्व प्राणी-पक्षी-पशू यांना पाण्याची गरज असते. परंतु माणसाच्या गरजा वाढत्या असतात. पूर्वी पाणी असेल तेथेच वस्ती असायची. पण आता वस्ती असते तेथे पाणी पुरवठा करावा लागतो. म्हणून जलव्यवस्थापनेत अडचण निर्माण होते. तसेच पाऊस हा लहरी असतो. त्याचे वाटपही समान नसते. तो कधी खूप पडतो म्हणून महापूर येतो तर कधी अजिबात पडत नाही म्हणून शेतकऱयाला आकाशाकडे डोळे लावून बसावे लागते. त्यामुळे जलव्यवस्थापनेत अडचण निर्माण होते.
भावी जीवनासाठी विचार करता काही उपाय योजना करता येतील.
- नव्या जलस्रोतांचा शोध घेणे.
- पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेती
व उद्योगांचे नियोजन करणे.
- जल वापरात घट करणे.
- पाणी वाया जावू न देणे
- परिसरात वनीकरण करणे.
- प्रदूषण रोखणे
- पावसाचे घरावर व छतावर पडणारे
पाणी योग्य रितीने साठवून वापरणे.
- जलवाटपासाठी वा संरक्षण नि संवर्धनासाठी योग्य तंत्र व साधने वापरणे.
- जनजागृती करणे, प्रभात फेऱया काढणे, वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध करणे, चित्र प्रदर्शन भरवणे, घोषवाक्मय तयार करणे, पथनाटय़ सादर करणे.
या वरील सर्व गोष्टींचा विचार करता नाश्चितच जलव्यवस्थापन होईल, यात मुळीच संदेह नाही.