प्रतिनिधी / सातारा
कोव्हिड 19 या संसर्गजन्य विषाणूमुळे शासनाने दि.24 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे नागठाणे येथील प्रत्येक मंगळवारी भरणारा आठवडी बाजार बंद झाला होता.परंतु पणन महामंडळ पुणे आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या सुचनेप्रमाणे खरीप हंगाम पूर्व शेतीची कामे पूर्ण होण्यासाठी पशुधनाची खरेदी विक्री होणे आवश्यक असल्याने दि. 23 पासून बाजार समिती मार्फत नागठाणे येथील जनावरे आठवडी बाजार पुन्हा सुरु होत आहे. व्यापाऱयांनी व शेतकऱयांनी आपली जनावरे खरेदी, विक्रीकरता आणावीत असे आवाहन सातारा शेती उत्पन्न बाजार समितीने केले आहे.