ऑनलाईन टीम / तरुण भारत :
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाने दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला असल्याचा आरोप होत आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठय़ा आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळविण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.
यासंदर्भात राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.
या ट्विटमध्ये राऊत यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळीही शेअर केल्या आहेत. त्यामध्ये ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली आहे. ही संसद देखील हिजडय़ांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, अशा या ओळी आहेत.
अधिक वाचा : उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात जाऊन बहुमत मिळवावे