ऑनलाईन टीम / तरुण भारत :
औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. नामांतराचा निर्णयाला शिंदे सरकारकडून आता स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात शिंदे सरकार पुन्हा नव्याने निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते.
ठाकरे सरकार कोसळण्यापूर्वी 29 जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप त्यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यानंतर हाच मुद्दा पुढे करत शिंदे सरकारने नामांतराला स्थगिती दिली आहे.
हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराला का घाबरता?, अजितदादांचा सवाल