आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांनी समाधानाने घरी जावं-दीपक केसरकरांचे आवाहन
Deepak Kesarkar Visit In Kolhapur : नागरिकांना हे आपलं सरकार वाटतं.नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारवर लिहून रोष ओढवून घेतला.खऱ्या अर्थाने आता जनतेच्या मनातील सरकार आले आहे. तुळशी विवाह पर्यंत आपली दिवाळी असते. उशिरा का होईना पण आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार. हि दिवाळी गोड करण्याचा निर्णय आम्ही घेतलायं अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. आज ते कोल्हापुरात (Kolhapur) ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो.आम्ही आसूड ओढण्याची भाषा करत नाही.अडीच वर्षे सत्तेत होते पण शेतकऱ्यांना मदत केली नाही.शेतकऱ्यांबाबत बोलत रहायचं पण शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही.बाळासाहेब यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही घडवतोय.बोलणं आणि करणं यात फरक आहे. बोलणारे सरकार आणि करणारे सरकार यातला फरक दिसतोय. आमचे विचार बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं.उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विचार घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल. आम्ही म्हणजे सर्वस्व हे चालत नाही.बाळासाहेब ठाकरे हे जनतेला आपले वाटायचे.
अधिक वाचण्यासाठी- चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर घणाघात; राज्यातील 63 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला
अतिवृष्टीची तातडीने पंचनामे केले जाईल.आणि तातडीने शेतकऱ्यांना मदत केली जाईल.कुणीही घाबरून जाऊ नये,हे तुमचं सरकार आहे. सरकार आता सोशल मीडियाचा वापर करून काम जनतेपर्यंत पोहचेल.शिक्षकांची भरती घेण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.आम्ही जे निर्णय घोषित करतो त्याची अंमलबजावणी करतो. आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांनी समाधानाने घरी जावं असे आवाहन दिपक केसरकर यांनी केलं.
LIVE पाहण्यासाठी येथे क्लिक करा:- पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापुरातून लाईव्ह
जिल्हा नियोजन मंडळाची नियुक्ती येत्या पंधरा दिवसात होतील.ज्या कामाना स्थगिती आली होती,त्याची स्थगिती उठवली आहे.ज्या लोकांची सत्ता गेली,ते नेहमी बोलत राहतील. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष का द्यायचं? थेट पाईपलाईन, भुविकास बँकेचा जीआर अडीच वर्षात का नाही निघाला.केवळ स्वार्थासाठी राजकारण करायचं नसतं.आम्ही केवळ घोषणा करत नाही, काम करून दाखवतो असेही ते म्हणाले.