पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळागडाची दुर्दशा थांबवण्यासाठी आज शिवप्रेमी व गडप्रेमी आक्रमक झाले. पन्हाळगडाचे संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारने गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, तातडीने संवर्धन करून पुरातत्व विभागाने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी करत आज किल्ले पन्हाळगडावर राज्यातील शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने जमा झाले. राज्य सरकारने सकारात्मक भूमिकांना घेतल्यास शिवप्रेमी त्यांच्या स्टाईल न्याय मागतील, असा इशाराही राज्य सरकारला दिला आहे.
दर पावसाळ्यात किल्ले पन्हाळगडावरील एक बुरुज ढासळतो. तर ठिकठिकाणी तटबंदी ढासळाला लागली आहे. याकडे पुरातत्व विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गडप्रेमी आणि शिवप्रेमी केला आहे. पुरातत्व विभागाला जागे करण्यासाठी आज राज्यातील गडप्रेमी ऐतिहासिक पन्हाळगडावर हजारोंच्या संख्येने दाखल झालेत. राज्यातून पुणे नाशिक परभणी उस्मानाबाद नागपूर मुंबईतून हे गडप्रेमी किल्ले पन्हाळगडावर दाखल झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत केले पन्हाळगडावरील अंबरखाना येथे जमून त्यांनी आंदोलनकर्त्याना संबोधित केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने पन्हाळगड दुमदुमून गेला. दरम्यान, राज्य सरकार सर्व पुरातत्व विभागाने सहकार्य करून मागण्या मान्य करावेत. अन्यथा आमच्या स्टाईलने आम्ही न्याय मागू असा इशाराही गडप्रेमींनी दिला आहे.
काय आहेत मागण्या?
-गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करावे
-राज्यातील सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन करावे
प्रत्येक गडकिल्ल्याच्या नावाने ट्रस्ट व्हावेत, त्यामध्ये गडप्रेमींना स्थान असावे.
-गडकिल्ल्यांवर प्लास्टिक बंदी करावी.
-गड किल्ल्यावर येताना हिंदू धर्माचा पेहराव असावा.
-गड किल्ल्यांवर चित्रपटाच्या चित्रिकारणास बंदी करावी
-किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे.
-प्रत्येक गडकिल्ल्यांवर भगवा ध्वज ३६५ दिवस फडकवावा.
हेही वाचा : देशाच्या ध्वज संहितेत मोठा बदल, आता 24 तास मानाने फडकवा तिरंगा