पुणे / प्रतिनिधी :
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱया चार ही धरणक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून, खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी एक वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून 11 हजार 900 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत,टेमघर,वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणामधील पाणीसाठय़ात चांगलीच वाढ होत आहे. सध्या धरणात जोरदार पाऊस सुरू असून, चार ही धरणात मिळून 10.29 टीएमसी, 37.01 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, तर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने रात्री 12 वाजल्यापासून खडकवासला धरणाच्या सांडव्यातून 856 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली. त्यामध्ये टप्प्या टप्प्याने वाढ करीत,आता दुपारी एक वाजण्याच्या सुमारास 11900 क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा : डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णसंख्येत पुणे ‘टॉप’वर