Satej patil vs dhanjay mahadik- महाभारत घडणार असेल तर आम्ही रामायण घडवणारी मंडळी आहोत. जर महाभारत घडले तर जनता पांडवाच रूप घेऊन उत्तर देईल, असा पलटवार माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
सत्ताधारी म्हणून आम्ही गोकुळची सभा शेवटपर्यंत चालवणार आहोत. या सभेला पाच तास लागले तरी शेवटच्या सभासदाचे समाधान होईपर्यंत ही सभा सुरू राहील. पूर्वी सभा गुंडाळण्याचे प्रकार सुरू होते. मात्र आम्ही सत्ताधारी म्हणून यावेळी असा प्रकार होऊ देणार नाही. सर्व सभासदांची समर्पक उत्तर दिली जातील. ३५ वर्षानंतर गोकुळ मध्ये सत्तांतर झाले आहे. शेतकऱ्यांची सत्ता या गोकुळ दूध संघावर आहे.असे सतेज पाटील म्हणाले.
जिल्ह्यात इथून पुढे महाभारत होईल, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिला होता. त्यावरून बोलताना पाटील यांनी उपरोधिक टोला खासदार महाडिक यांना लगावला. रामायण घडवणारी आम्ही मंडळी आहोत. त्यामुळे जे चांगलं करण्याचा प्रयत्न आहे. ते आम्ही करत आहोत. जरी महाभारत घडलं तर जनता पांडवाचे रूप घेऊन काय करायचं ते करेल? असे पाटील म्हणाले.
विकासाच्या गोष्टी करू
गेल्या अडीच वर्षात विकास काम करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतात. अजून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लांब आहेत. त्यावेळी आरोप प्रत्यारोप करू, मात्र सध्या आपण काय करणार आहोत? हे लोकांना सांगितलं गरजेच आहे. असे सतेज पाटील म्हणाले.
हे ही वाचा : जन-गण-मन लवकर न म्हणता शेवटच्या सभासदाचे समाधान होईल – मुश्रीफ
हद्दवाढीचे राजकारण नको
हद्दवाढ वरून बोलताना ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांना महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे मात्र हद्दवाढ करत असताना राजकारण कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये असे सतेज पाटील म्हणाले.
संजय मंडलिक आमच्यासोबत राहतील ही अपेक्षा
स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकारण वेगळा असते राज्यस्तरावर संजय मंडलिक हे भाजपसोबत असले तरी स्थानिक राजकारणात ते आमच्या सोबतच राहतील अशी अपेक्षा सतीश पाटील यांनी व्यक्त केले